शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 13:20 IST

आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी लागू केल्यापासून सर्वत्र बेकायदा दारूचे मोठ्या प्रमाणात गाळप सुरू झाले असून, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यात काहीही मिसळले जात असून, गेल्या काही दिवसात तर राज्यात किमान ४० जण विषारी दारू प्यायल्याने मरण पावले आहेत.

गोपाळगंज, बेतिया, समस्तीपूर या तीन जिल्ह्यात सध्या विषारी दारू प्यायल्याने अनेक जण मरण पावले असून, कित्येकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लष्करातील एक जवान व बीएसएफचा उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. ते दोघे दिवाळीत सुटी मिळाल्याने आपापल्या गावी आले होते. दोघांचा मृत्यू शुक्रवारी संध्याकाळी झाला.

आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे. विषारी दारू प्यायल्याने काही जणांची दृष्टीही गेली आहे. अनेकांना उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असा त्रास होत आहे. समस्तीपूरमध्ये ज्याने ही दारू तयार केली, तोही अत्यवस्थ असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात दारूचे गाळप  वाढले असून, त्याशिवाय अन्य मार्गांनी दारू दुसऱ्या राज्यांतूनही आणली जात आहे.

मोठ्या शहरांमध्ये दारूबंदी बऱ्यापैकी लागू असून, तिथे पोलिसांचे लक्षही असते. त्यामुळे तिथे अशा घटना कमी आहेत. ग्रामीण भागात मात्र बेकायदा तसेच विषारी दारूने कहर केला आहे. पोलीस व राज्य सरकार यांचे दारूमाफियांवर नियंत्रण नाही आणि काही जणांचा तर या माफियांशी थेट संबंध आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला.

बंदी उठवा

दारूबंदी घातल्यापासून बेकायदा धंदे वाढले आहेत आणि विषारी दारूने लोक मरण पावण्याचे प्रमाणही खूप वाढले आहेत. लोकांना असे मरू देण्यापेक्षा दारूबंदी उठवा, त्यामुळे लोकांना चांगल्या दर्जाची दारू मिळेल आणि त्यांचे जीवनही वाचेल, असे आवाहन काँग्रेसने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी