शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतातील ४ राज्ये संसर्गमुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:52 IST

त्रिपुरातील दुसरा रुग्णही शनिवारी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता ईशान्य भारतातील कोरोना विषाणूमुक्त राज्यांची संख्या ४ झाली आहे. यामध्ये त्रिपुरासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.

अगरतळा/इम्फाळ : कोरोना विषाणूची लागण झालेला त्रिपुरातील दुसरा रुग्णही शनिवारी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता ईशान्य भारतातील कोरोना विषाणूमुक्त राज्यांची संख्या ४ झाली आहे. यामध्ये त्रिपुरासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.ईशान्य भारतातील आसाम या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले १५ रुग्ण असून, त्याशिवाय मेघालयमध्ये ११ व मिझोराममध्ये एक रुग्ण आहे. त्याशिवाय नागालँडच्या दिमापूर येथील एका बाधित महिलेवर गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १२ एप्रिलपासून उपचार सुरू आहेत.त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी सांगितले की, त्रिपुरामधील दुसरा व अखेरचा ‘कोविड- १९’चा रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला असून त्याला शनिवारी घरी पाठविण्यात आले. त्यामुळे हे राज्य कोरोना विषाणूमुक्त झाले आहे. डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांनी अहोरात्र केलेले परिश्रम तसेच जनतेने दिलेले सहकार्य यामुळे ही गोष्ट साध्य करता आल्याचे विप्लवकुमार देव म्हणाले.पूर्णपणे बरा झालेला दुसरा रुग्ण उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी असून तो त्रिपुरा राज्य रायफल दलामध्ये जवान आहे. त्याच्यावर गोविंद वल्लभ पंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आता यापुढे तो घरातच १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहे. त्रिपुरातील पहिला रुग्ण असलेली महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला १५ एप्रिल रोजी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आरोग्य खात्याची जबाबदारी तेथील मुख्यमंत्र्यांकडेच आहे.ब्रिटनहून इम्फाळला परतलेल्या एका २३ वर्षे वयाच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाले होते. उपचारानंतर पूर्णपणे बरी झालेली ती ईशान्य भारतातील पहिली रुग्ण ठरली.>आतापर्यंत पाच राज्यांनी घेतला मोकळा श्वासदेशात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या २५ हजारावर गेली असतानाच ५ राज्ये ‘कोविड-१९’ या भयंकर संसर्गजन्य रोगापासून मूक्त होत त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. देशामध्ये सर्वात आधी गोवा हे राज्य कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाले. त्यानंतर मणिपूरचा क्रमांक लागला. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा ही राज्येदेखील नंतर कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मूक्त झाली. ईशान्य भारतातील सर्व म्हणजे आठही राज्यांत शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या