शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

ईशान्य भारतातील ४ राज्ये संसर्गमुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:52 IST

त्रिपुरातील दुसरा रुग्णही शनिवारी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता ईशान्य भारतातील कोरोना विषाणूमुक्त राज्यांची संख्या ४ झाली आहे. यामध्ये त्रिपुरासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.

अगरतळा/इम्फाळ : कोरोना विषाणूची लागण झालेला त्रिपुरातील दुसरा रुग्णही शनिवारी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता ईशान्य भारतातील कोरोना विषाणूमुक्त राज्यांची संख्या ४ झाली आहे. यामध्ये त्रिपुरासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.ईशान्य भारतातील आसाम या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले १५ रुग्ण असून, त्याशिवाय मेघालयमध्ये ११ व मिझोराममध्ये एक रुग्ण आहे. त्याशिवाय नागालँडच्या दिमापूर येथील एका बाधित महिलेवर गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १२ एप्रिलपासून उपचार सुरू आहेत.त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी सांगितले की, त्रिपुरामधील दुसरा व अखेरचा ‘कोविड- १९’चा रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला असून त्याला शनिवारी घरी पाठविण्यात आले. त्यामुळे हे राज्य कोरोना विषाणूमुक्त झाले आहे. डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांनी अहोरात्र केलेले परिश्रम तसेच जनतेने दिलेले सहकार्य यामुळे ही गोष्ट साध्य करता आल्याचे विप्लवकुमार देव म्हणाले.पूर्णपणे बरा झालेला दुसरा रुग्ण उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी असून तो त्रिपुरा राज्य रायफल दलामध्ये जवान आहे. त्याच्यावर गोविंद वल्लभ पंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आता यापुढे तो घरातच १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहे. त्रिपुरातील पहिला रुग्ण असलेली महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला १५ एप्रिल रोजी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आरोग्य खात्याची जबाबदारी तेथील मुख्यमंत्र्यांकडेच आहे.ब्रिटनहून इम्फाळला परतलेल्या एका २३ वर्षे वयाच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाले होते. उपचारानंतर पूर्णपणे बरी झालेली ती ईशान्य भारतातील पहिली रुग्ण ठरली.>आतापर्यंत पाच राज्यांनी घेतला मोकळा श्वासदेशात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या २५ हजारावर गेली असतानाच ५ राज्ये ‘कोविड-१९’ या भयंकर संसर्गजन्य रोगापासून मूक्त होत त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. देशामध्ये सर्वात आधी गोवा हे राज्य कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाले. त्यानंतर मणिपूरचा क्रमांक लागला. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा ही राज्येदेखील नंतर कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मूक्त झाली. ईशान्य भारतातील सर्व म्हणजे आठही राज्यांत शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या