शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 05:44 IST

२०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत (आरएमएस) हरभरा खरेदीत मोठी घट झाली. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बाजारपेठेतील वाढत्या किमतींमुळे २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत (आरएमएस) हरभरा खरेदीत मोठी घट झाली. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.  मागील हंगामात ३.९३ लाख शेतकरी लाभार्थी होते. यंदा हा आकडा शून्यावर आला आहे. म्हणजेच ही खरेदी जवळपास पूर्णपणे थांबली आहे. आकडेवारीवरून संपूर्ण भारतातील फक्त १५,४०९ शेतकऱ्यांना फायदा झाला. २०२३-२४ च्या रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीचा १०.२ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या ९९ टक्क्यांनी कमी आहे. मध्य प्रदेशातील १४,३२२, राजस्थानातील ६४३, तेलंगणातील ३६० आणि गुजरातमधील फक्त ८४ शेतकऱ्यांना लाभ झाला. 

मसूर खरेदी का वाढली? मसूर खरेदी २१४ टक्क्यांनी वाढली, जी २०२४-२५ मध्ये जवळपास २.४ लाख टनांवर पोहोचली. २०२४-२५ च्या रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत लाभार्थी मसूर शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढून १.१४ लाख झाली. यात महाराष्ट्राचा सहभाग नव्हता. 

खरेदी का थांबली? सीएसीपीच्या आकडेवारीनुसार, हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावाच्यावर गेल्याने सरकारी खरेदी व्यवहार न होण्यामागचे प्रमुख कारण ठरले. २०२३-२४ मध्ये हरभऱ्याची २३.५ लाख टन खरेदी झाली होती, जी यंदा २०२४-२५ मध्ये फक्त ४३,००० टनांवर आली. 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र