शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 05:44 IST

२०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत (आरएमएस) हरभरा खरेदीत मोठी घट झाली. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बाजारपेठेतील वाढत्या किमतींमुळे २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत (आरएमएस) हरभरा खरेदीत मोठी घट झाली. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे.  मागील हंगामात ३.९३ लाख शेतकरी लाभार्थी होते. यंदा हा आकडा शून्यावर आला आहे. म्हणजेच ही खरेदी जवळपास पूर्णपणे थांबली आहे. आकडेवारीवरून संपूर्ण भारतातील फक्त १५,४०९ शेतकऱ्यांना फायदा झाला. २०२३-२४ च्या रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीचा १०.२ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या ९९ टक्क्यांनी कमी आहे. मध्य प्रदेशातील १४,३२२, राजस्थानातील ६४३, तेलंगणातील ३६० आणि गुजरातमधील फक्त ८४ शेतकऱ्यांना लाभ झाला. 

मसूर खरेदी का वाढली? मसूर खरेदी २१४ टक्क्यांनी वाढली, जी २०२४-२५ मध्ये जवळपास २.४ लाख टनांवर पोहोचली. २०२४-२५ च्या रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत लाभार्थी मसूर शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढून १.१४ लाख झाली. यात महाराष्ट्राचा सहभाग नव्हता. 

खरेदी का थांबली? सीएसीपीच्या आकडेवारीनुसार, हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावाच्यावर गेल्याने सरकारी खरेदी व्यवहार न होण्यामागचे प्रमुख कारण ठरले. २०२३-२४ मध्ये हरभऱ्याची २३.५ लाख टन खरेदी झाली होती, जी यंदा २०२४-२५ मध्ये फक्त ४३,००० टनांवर आली. 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र