शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:29 IST

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली.

भुवनेश्वर : लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे गुरुवारी सकाळी कटकपासून १५ किलोमीटर अंतरावरील नरगुंडी स्टेशनपाशी रुळावरून घसरल्याने १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही गाडी एका मालगाडीवर आदळली आणि रुळावरून पाच डबे घसरले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. अतिशय दाट धुक्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला मालगाडी दिसली नाही आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.जखमी ओडिशाचे आहेत की, त्यात मुंबई वा महाराष्ट्रातील कोणी आहे, हेही स्पष्ट झाले नाही. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी कटक तसेच मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने व्यवस्था केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. जखमींना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रेल्वेची अ‍ॅक्सिडेंट मेडिकल व्हॅनही पाठविण्यात आली. या अपघातामुळे आठ ते नऊ दूर पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यात भुवनेश्वरहून मुंबईला येणाºया एका गाडीचाही समावेश होता. 

टॅग्स :railwayरेल्वे