शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:29 IST

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली.

भुवनेश्वर : लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे गुरुवारी सकाळी कटकपासून १५ किलोमीटर अंतरावरील नरगुंडी स्टेशनपाशी रुळावरून घसरल्याने १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही गाडी एका मालगाडीवर आदळली आणि रुळावरून पाच डबे घसरले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. अतिशय दाट धुक्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला मालगाडी दिसली नाही आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.जखमी ओडिशाचे आहेत की, त्यात मुंबई वा महाराष्ट्रातील कोणी आहे, हेही स्पष्ट झाले नाही. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी कटक तसेच मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने व्यवस्था केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. जखमींना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रेल्वेची अ‍ॅक्सिडेंट मेडिकल व्हॅनही पाठविण्यात आली. या अपघातामुळे आठ ते नऊ दूर पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यात भुवनेश्वरहून मुंबईला येणाºया एका गाडीचाही समावेश होता. 

टॅग्स :railwayरेल्वे