शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

५६ वर्षांपूर्वी कोसळलं होतं विमान; भारतीय लष्कराच्या हाती लागले ४ मृतदेह, ओळखही पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:30 IST

५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या विमानातील प्रवाशांचे मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागले आहेत.

IAF Plane Crash : भारतीय सैन्याच्या शौर्याचे जगभरात नेहमीच कौतुक होत असतं. भारतीय सैन्याने अनेक धाडसी मोहिमा करत शत्रूंना शह दिला आहे. मात्र काही कारवायांमध्ये काही सैनिकांना यश आलं नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. याचाच प्रत्यय आता आला आहे. सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्येही एक अपघात झाला होता. भारतीय हवाई दलाच्या एका विमानाला रोहतांग पासजवळ भीषण अपघात झाला. त्यात विमानात तब्बल १०२ लोक होते. अपघातानंतर बेपत्ता लोकांची खूप शोधाशोध करण्यात आली. पण सर्व मृतदेह सापडले नाहीत. पण लष्कराने हार मानली नाही आणि आज तब्बल ५६ वर्षांनंतर चार मृतदेह सापडले आहेत. ही भारतातील सर्वात लांब शोध मोहिमांपैकी एक मानली जाते.

सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये ही दुर्घटना घडली होती. रोहतांग पास येथे भारतीय हवाई दलाच्या AN-१२ विमानाला अपघात झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४ जणांचे मृतदेह नुकतेच बाहेर काढण्यात आले आहेत. भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या शोध मोहिमेपैकी हे एक मोहिम आहे. भारतीय लष्कराच्या डोगरा स्काउट्स आणि तिरंगा माउंटन रेस्क्यूच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना ७ फेब्रुवारी १९६८ साली घडली होती.डबल इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान १०२ प्रवाशांसह चंदीगडहून लेहला जात होते. मात्र मधेच ते खराब झाले आणि रोहतांग पासवर कोसळले. २००३ मध्ये, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या गिर्यारोहकांनी त्या विमानाचा सांगाडा शोधून काढला होता. यानंतर शोध मोहिमेत भारतीय लष्कर विशेषत: डोग्रा स्काऊट्स तैनात करण्यात आले. डोग्रा स्काउट्सने २००५, २००६, २०१३ आणि २०१९ मध्ये विविध मोहिमा राबवत शोधकार्य केलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे पोहोचणे फारच कठीण होते. २०१९ पर्यंत तिथून फक्त पाच मृतदेह बाहेर काढता आले होते. आता चंद्रभागा पर्वत मोहिमेत आणखी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना नवी आशा मिळाली आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी तिघांची ओळख पटली आहे. मलखान सिंग, हवालदार नारायण सिंग आणि कारागीर थॉमस चरण अशी त्यांची नावे असल्याचे समोर आलं आहे.

मृतदेहांजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. मात्र चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. क्राफ्टमॅन थॉमस चरण हे केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील एलांथूरचे रहिवासी होते. त्याच्या कुटुंबियांना याची माहिती पाठवण्यात आली आहे. कॉन्स्टेबल नारायण सिंह हे लष्कराच्या वैद्यकीय पथकात काम करायचे. ते उत्तराखंडमधील गढवालमधील चमोली तहसीलमधील कोलपाडी गावचे रहिवासी होते. दरम्यान, ही शोध मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे लष्कराने सांगितले. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल