शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

५६ वर्षांपूर्वी कोसळलं होतं विमान; भारतीय लष्कराच्या हाती लागले ४ मृतदेह, ओळखही पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:30 IST

५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या विमानातील प्रवाशांचे मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागले आहेत.

IAF Plane Crash : भारतीय सैन्याच्या शौर्याचे जगभरात नेहमीच कौतुक होत असतं. भारतीय सैन्याने अनेक धाडसी मोहिमा करत शत्रूंना शह दिला आहे. मात्र काही कारवायांमध्ये काही सैनिकांना यश आलं नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. याचाच प्रत्यय आता आला आहे. सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्येही एक अपघात झाला होता. भारतीय हवाई दलाच्या एका विमानाला रोहतांग पासजवळ भीषण अपघात झाला. त्यात विमानात तब्बल १०२ लोक होते. अपघातानंतर बेपत्ता लोकांची खूप शोधाशोध करण्यात आली. पण सर्व मृतदेह सापडले नाहीत. पण लष्कराने हार मानली नाही आणि आज तब्बल ५६ वर्षांनंतर चार मृतदेह सापडले आहेत. ही भारतातील सर्वात लांब शोध मोहिमांपैकी एक मानली जाते.

सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये ही दुर्घटना घडली होती. रोहतांग पास येथे भारतीय हवाई दलाच्या AN-१२ विमानाला अपघात झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४ जणांचे मृतदेह नुकतेच बाहेर काढण्यात आले आहेत. भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या शोध मोहिमेपैकी हे एक मोहिम आहे. भारतीय लष्कराच्या डोगरा स्काउट्स आणि तिरंगा माउंटन रेस्क्यूच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना ७ फेब्रुवारी १९६८ साली घडली होती.डबल इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान १०२ प्रवाशांसह चंदीगडहून लेहला जात होते. मात्र मधेच ते खराब झाले आणि रोहतांग पासवर कोसळले. २००३ मध्ये, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या गिर्यारोहकांनी त्या विमानाचा सांगाडा शोधून काढला होता. यानंतर शोध मोहिमेत भारतीय लष्कर विशेषत: डोग्रा स्काऊट्स तैनात करण्यात आले. डोग्रा स्काउट्सने २००५, २००६, २०१३ आणि २०१९ मध्ये विविध मोहिमा राबवत शोधकार्य केलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे पोहोचणे फारच कठीण होते. २०१९ पर्यंत तिथून फक्त पाच मृतदेह बाहेर काढता आले होते. आता चंद्रभागा पर्वत मोहिमेत आणखी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना नवी आशा मिळाली आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी तिघांची ओळख पटली आहे. मलखान सिंग, हवालदार नारायण सिंग आणि कारागीर थॉमस चरण अशी त्यांची नावे असल्याचे समोर आलं आहे.

मृतदेहांजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. मात्र चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. क्राफ्टमॅन थॉमस चरण हे केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील एलांथूरचे रहिवासी होते. त्याच्या कुटुंबियांना याची माहिती पाठवण्यात आली आहे. कॉन्स्टेबल नारायण सिंह हे लष्कराच्या वैद्यकीय पथकात काम करायचे. ते उत्तराखंडमधील गढवालमधील चमोली तहसीलमधील कोलपाडी गावचे रहिवासी होते. दरम्यान, ही शोध मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे लष्कराने सांगितले. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल