शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'ते' 39 भारतीय अवैधरित्या इराकला गेले होते- व्ही. के. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 08:54 IST

39 भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली.

आयसिस या दहशतवादी संघटनेकडून इराकमध्ये मारले गेलेले 39 भारतीय हे भारतातून अवैधरित्या आखाती देशात गेले होते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी ही माहिती दिली आहे. इराकमधील मोसूल भागात 2014 मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 39 भारतीयांची हत्या केली होती. त्यांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. याबद्दल बोलताना हे सर्व भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली. या नागरिकांची कोणतीही नोंद मध्य पूर्वेतील दूतावासाकडे नव्हती, असेही त्यांनी सांगितले.इराकमध्ये मारल्या गेलेल्या 39 भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष आणण्यासाठी व्ही. के. सिंग इराकला गेले होते. या मृतदेहांचे अवशेष हवाई मार्गे भारतात आणण्यात आले. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए  न जुळल्याने 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात आणले गेले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा बेकायदेशीर प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सिंह म्हणाले. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :VK Singhव्ही के सिंग