शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 06:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय या गटांमधील एकूण ३१ मंत्री आहेत. त्यापैकी काही मंत्री हे माजी सनदी अधिकारी, आयआयटीतून शिक्षण घेतलेले तर काही जण डॉक्टर व अन्य पेशातीलआहेत.

हरिश गुप्ता - नवी दिल्ली : साऱ्या देशाला अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय या गटांमधील एकूण ३१ मंत्री आहेत. त्यापैकी काही मंत्री हे माजी सनदी अधिकारी, आयआयटीतून शिक्षण घेतलेले तर काही जण डॉक्टर व अन्य पेशातीलआहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला समावेश हेही एक मोठे वैशिष्ट्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी १२ जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एक दोन महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी राजकीय निरीक्षकांनी बांधलेली अटकळ अखेर खरी ठरली. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत कोरोना साथीमुळे देशाची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. तसेच कोरोना लसी, औषधे, आॅक्सिजन अशा अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कोरोना स्थिती नीटपणे हाताळता आली नाही अशी टीका बहुतांश राज्यातून होऊ लागली होती.

२०२४ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुका तसेच येत्या एक दोन वर्षात उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन व केंद्र सरकारच्या कारभारावर कोणीही बोट ठेवू नये यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणे आवश्यक बनले होते. ती गरज बुधवारी पूर्ण झाली आहे.

हरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर यांना बढतीहरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर आदींना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी केलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीस उतरले होते.

२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्वकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.

नारायण राणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्रीगेल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये चेंबूर येथील शिवसेना शाखाप्रमुख, मुंबई महापालिकेत १९८५ ते १९९१ नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री अशी त्यांची वाटचाल आहे. कणकवली तालुक्यातील वरवडे गावी गरीब कुटुंबात १० एप्रिल १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला. १९९० पासून सलग सहावेळा आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१८ मध्ये भाजपला पाठिंबा जाहीर करून ते राज्यसभेवर निवडून गेले. 

डॉ. भागवत कराड, अर्थ राज्यमंत्री अहमदपूर तालुक्यातील चिखली हे डॉ. भागवत कराड यांचे मूळ गाव. १८ मार्च २०२० रोजी राज्यसभेवर निवडले गेले. सव्वा वर्षाच्या काळात त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. वंजारी समाजाचे असलेले डॉ. कराड यांचा समावेश हा महाराष्ट्रातील वंजारी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आणि पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीही झाल्याचे दिसते. भागवत कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सान्निध्यात आले. 

कपिल पाटील, पंचायत राज राज्यमंत्रीकपिल पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. भिवंडीतील मोरेश्वर पाटील व मणिबाई पाटील यांचे पुत्र असलेले कपिल यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कला शाखेतून  पदवी घेतली आहे. १९८८ मध्ये प्रथम पाटील यांनी दिवे अंजूर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. १९९२ मध्ये ते भिवंडी पंचायत समितीचे सदस्य तर म्हणून निवडून आले. ते मार्च २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. 

डॉ. भारती पवार, आराेग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीसलग दोन निवडणुकीत विजय संपादन करून सात वर्षे जि. प. सदस्य म्हणून काम केल्यानंतर, थेट लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. भारती पवार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. लोकसभा निवडणुकीचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना दोन वर्षांपूर्वी दिंडोरी मतदार संघातून पवार या भाजपच्या उमेदवारीवर मतदारांना सामोऱ्या गेल्या व निवडूनही आल्या. 

दानवेंकडे रेल्वे, काेळसा  आणि खाण राज्यमंत्रिपदरावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, काेळसा  आणि खाण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्रिपदाचा कार्यभार हाेता. 

१२ मंत्र्यांचे राजीनामेकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.

निष्ठेपेक्षा राजकीय गणित माेठेया मंत्रिमंडळ विस्तारात राजकीय निष्ठेपेक्षा राजकीय गणितांचा विचार जास्त केला आहे. त्यामुळेच नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली व ज्यांची मंत्रीपदे काढून घेण्यात आली त्यात रा. स्व. संघ व भाजपशी एकनिष्ठ असलेल्या मंत्र्यांची बहुसंख्या आहे. या साऱ्या गोष्टींना छेद देणारी घटना म्हणजे मध्य प्रदेशमधून सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले वीरेंद्रकुमार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. ते पूर्वी संघ स्वयंसेवक होते व नंतर भाजपमध्ये सक्रिय झाले होते.

पीयूष गाेयल यांच्याकडे रेल्वेऐवजी वस्त्राेद्याेग खातेपीयूष गाेयल यांच्याकडील रेल्वे खात्याचा पदभार काढून त्यांना वस्त्राेद्याेग मंत्रालय देण्यात आले आहे. हे खाते अगाेदर स्मृती इराणी यांच्याकडे हाेते.

वैशिष्ट्ये काय? -- अनुसूचित जातीचे १२ मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री- अनुसूचित जमातीचे ८ मंत्री, त्यातील ३ कॅबिनेट मंत्री- मागासवर्गीय गटातील २७ मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री- अल्पसंख्याक गटातील ५ मंत्री, त्यातील ३ कॅबिनेट मंत्री- ११ महिला मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री- ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले १४ मंत्री, त्यातील ६ कॅबिनेट मंत्री- नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सरासरी वय ५८ वर्षे- मंत्र्यांमध्ये १२ वकिल आणि ६ डॉक्टर्स 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे piyush goyalपीयुष गोयलraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा