शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:01 IST

Entrepreneurs left India: पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत.

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या सहा वर्षांत म्हणजेच 2014 ते 2020 मध्ये जवळपास 35,000 उद्योगपतींनी देश सोडला असल्याचे अमित मित्रा यांनी म्हटले आहे. तसेच, उद्योगपती भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून जात आहेत, असे वाटत आहे. या प्रकरणावर संसदेत श्वेतपत्र जारी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणीही अमित मित्रा यांनी केली आहे. ( 35,000 high net worth entrepreneurs left India during Narendra Modi regime: Amit Mitra)

याचबरोबर, पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत. अमित मित्रा यांनी गुरुवारी एकापाठोपाठ अनेक ट्वीट केले. ते म्हणाले, 'भारत जगात स्थलांतराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ... शेवटी का? 'भीतीचे वातावरण'? पंतप्रधानांनी आपल्या सरकारमध्ये उद्योजकांच्या या मोठ्या स्थलांतरावर संसदेत श्वेतपत्रिका जारी करावी.

याशिवाय, अमित मित्रा म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्लीच्या (organ Stanley) रिपोर्टनुसार, जवळपास 23,000 हाय नेटवर्थ उद्योजकांनी 2014 ते 2018 दरम्यान भारत सोडला. ही जगातील सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे, ग्लोबल वेल्थ मायग्रेशन (Global Wealth Migration) रिपोर्टनुसार, 2019 मध्ये 7,000 आणि 2020 मध्ये 5,000 व्यवसायिकांनी भारत सोडला आहे.

अमित मित्रा यांनी या प्रकरणी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "पीयूष गोयल यांचे 19 मिनिटांचे भाषण लक्षात ठेवा, ज्यात ते भारतीय व्यापारी क्षेत्रातील प्रथेला देशाच्या हिताच्या विरोधात सांगत आहेत. म्हणजेच ते एक प्रकारे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत. अशा भीतीच्या वातावरणातूनच स्थलांतर वाढते. असे असूनही, पंतप्रधानांनी पीयूष गोयल यांना फटकारले नाही.  अखेर का?"  दरम्यान, अमित मित्रा प्रत्यक्षात पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत होते, जे त्यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये सीआयआय कार्यक्रमात केले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय