शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:01 IST

Entrepreneurs left India: पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत.

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या सहा वर्षांत म्हणजेच 2014 ते 2020 मध्ये जवळपास 35,000 उद्योगपतींनी देश सोडला असल्याचे अमित मित्रा यांनी म्हटले आहे. तसेच, उद्योगपती भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून जात आहेत, असे वाटत आहे. या प्रकरणावर संसदेत श्वेतपत्र जारी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणीही अमित मित्रा यांनी केली आहे. ( 35,000 high net worth entrepreneurs left India during Narendra Modi regime: Amit Mitra)

याचबरोबर, पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत. अमित मित्रा यांनी गुरुवारी एकापाठोपाठ अनेक ट्वीट केले. ते म्हणाले, 'भारत जगात स्थलांतराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ... शेवटी का? 'भीतीचे वातावरण'? पंतप्रधानांनी आपल्या सरकारमध्ये उद्योजकांच्या या मोठ्या स्थलांतरावर संसदेत श्वेतपत्रिका जारी करावी.

याशिवाय, अमित मित्रा म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्लीच्या (organ Stanley) रिपोर्टनुसार, जवळपास 23,000 हाय नेटवर्थ उद्योजकांनी 2014 ते 2018 दरम्यान भारत सोडला. ही जगातील सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे, ग्लोबल वेल्थ मायग्रेशन (Global Wealth Migration) रिपोर्टनुसार, 2019 मध्ये 7,000 आणि 2020 मध्ये 5,000 व्यवसायिकांनी भारत सोडला आहे.

अमित मित्रा यांनी या प्रकरणी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "पीयूष गोयल यांचे 19 मिनिटांचे भाषण लक्षात ठेवा, ज्यात ते भारतीय व्यापारी क्षेत्रातील प्रथेला देशाच्या हिताच्या विरोधात सांगत आहेत. म्हणजेच ते एक प्रकारे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत. अशा भीतीच्या वातावरणातूनच स्थलांतर वाढते. असे असूनही, पंतप्रधानांनी पीयूष गोयल यांना फटकारले नाही.  अखेर का?"  दरम्यान, अमित मित्रा प्रत्यक्षात पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत होते, जे त्यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये सीआयआय कार्यक्रमात केले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय