शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीत काँग्रेसला धक्का! ३५ नेत्यांचा राजीनामा; पक्षातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर

By देवेश फडके | Updated: January 9, 2021 16:17 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.

ठळक मुद्देरायबरेलीतील ३५ नेते, पदाधिकाऱ्यांचा राजीनामाकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवल्याची माहिती उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का

रायबरेली :काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. पक्षात आता जुन्या सहकाऱ्यांना डावलले जात आहे. पक्षातील जुन्या पदाधिकारी तसेच नेत्यांची दखलही घेतली जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. 

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे रायबरेलीमधील पक्षाची अवस्था अमेठीसारखी होईल, असा दावा या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वृत्त फेटाळत त्यांच्याकडे कोणतेही राजीनामे आलेले नाहीत, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन कार्यकारिणी स्थापन केली होती. यानंतर पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा नव्या कार्यकारिणीला विरोध करण्यात आला. 

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी अनेक जण कार्यरत आहेत. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली जात आहे. तर दुसरीकडे, ३० वर्षांपासून पक्षासाठी कार्यरत असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच्या चुका आणि कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अस दावा प्रदेश सचिव आणि काँग्रेस कमिटी सदस्य शिव कुमार पांडे यांनी यावेळी केला. 

तत्पूर्वी, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमेठीतून निवडून आलेल्या केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी आता २०२४ मध्ये रायबरेलीत भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशSonia Gandhiसोनिया गांधीrae-bareli-pcरायबरेली