शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धक्कादायक! 2017 मध्ये लग्नासाठी 3,400 नवरदेवांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 13:31 IST

जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे.

पाटणा - लग्नासाठी मुलगी तयार होत नसेल तर मुल मुलीला पळवून आणतात. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट घडलं आहे. बिहारमध्ये जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे. अशा प्रकारच्या लग्नाला बिहारमध्ये पाकदुआ विवाह म्हटले जाते. जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी 3405 युवकांचे अपहरण करण्यात आले. 

बंदुकीच्या धाकावर किंवा धमकी देऊन हे विवाह लावण्यात आले अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली. मागच्या महिन्यात पाटण्यामध्ये बंदुकीच्या धाकावर एका इंजिनिअरचे अपहरण करुन त्याचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. त्या घटनेला राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे प्रसिद्धी मिळाली होती. 

2016 मध्ये पाकदुआ विवाहासाठी 3070, 2015 मध्ये तीन हजार आणि 2014 मध्ये 2,526 युवकांचे अपहरण करण्यात आले. या विवाहांमध्ये युवक आणि त्याच्या कुटुंबियांना धाक दाखवून लग्नाला भाग पाडण्यात आले अशी माहिती पोलीस  अधिका-याने दिली.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बिहारमध्ये दरदिवशी नऊ विवाह जबरदस्तीने लावले जातात.  

काय घडलं विनोद कुमारच्या बाबतीत

बंदुकीच्या धाकावर 29 वर्षीय इंजिनिअर विनोद कुमारचे अपहरण करुन त्याला लग्नासाठी थेट विवाहाच्या मांडवात आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथील पांडाराक भागात ही धक्कादायक घटना घडली. विनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे. 

अपहरण केल्यानंतर विनोद कुमारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने विवाहासाठी मांडवात बसवण्यात आले. ही जबरदस्ती सुरु असताना विनोद कुमार अक्षरक्ष: रडून मदतीसाठी याचना करत होता. पण मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या.  एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये आपली वधूपक्षाकडच्या एका नातेवाईकाबरोबर ओळख झाली तिथे त्या नातेवाईकाने आपल्या डोक्याला बंदुक लावली व लग्नाला भाग पाडले असा आरोप विनोद कुमारने केला.