शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मध्यप्रदेशात २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू...!

By admin | Updated: January 3, 2017 04:01 IST

एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले

भोपाळ : एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. शिकार, आपसातील लढाई आणि नैसर्गिक कारणे यासह विविध कारणांमुळे वाघ मृत्युमुखी पडले.गेल्या ५ वर्षांत मध्यप्रदेशात ११ छाव्यांसह ८९ वाघांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये १६ वाघांचा मृत्यू झाला, तर २०१३ मध्ये ११ वाघ मृत्युमुखी पडले. २०१४ मध्ये १४, २०१५ मध्ये १५ आणि २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू झाला. २०१२ पासून २०१५ पर्यंत दरवर्षी सरासरी १४ वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी ३३ वाघ मृत्युमुखी पडले. हे प्रमाण गेल्या चार वर्षांतील प्रमाणाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ आपसातील लढाईत मृत्युमुखी पडले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी विष किंवा विजेचा धक्का देऊन ठार मारले. उर्वरित वाघ आजारपण, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत, वन्यजीव कार्यकर्त्याचा आरोपवाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्यास वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हेही एक कारण आहे, असा आरोप वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी केला. या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ हद्दीच्या वादावरून आपसात झालेल्या लढाईत मारले गेले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी शिकार करून, विष देऊन किंवा विजेचा झटका देऊन ठार केले. जर वनविभाग सतर्क राहिला असता, तर या ५२ वाघांचे प्राण वाचविता येऊ शकत होते, असे ते म्हणाले. कोणत्याही वाघाच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरविले जावे, अशी शिफारस केंद्राच्या कृती गटाने २००५ मध्ये केली होती. तथापि, या शिफारशीचे राज्यात पालन झाले नाही. सरकारी अधिकारीच न्यायालयात जबाब फिरवत असल्यामुळे शिकारी सहजपणे सुटतात. शिक्षा झालेल्या शिकाऱ्यांची संख्या नगण्य आहे, असेही त्यांनी सांगितले.