शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३३ टक्के एटीएम निकामी

By admin | Updated: May 26, 2016 02:06 IST

प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा

मुंबई : प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेनेच एका अभ्यासाअंती काढला असून यासंदर्भात बँकांचे कान उपटले आहेत. एटीएमसंदर्भात सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेत यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वत:हून पुढाकार घेत देशातील सुमारे चार हजार एटीएमची तपासणी केली. सर्वेक्षणासाठी चार हजारांचा आकडा हा मोठा असून याआधारेच हा निष्कर्ष काढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या अभ्यासानंतर रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांनी बारकाईने लक्ष देत सर्व मशिन्स नीट व व्यवस्थित सुरू राहतील याबाबत दक्षता घेण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. तसेच रिझर्व्ह बँक या मशिनच्या स्थितीचा नियमितपणे आढावा घेत राहील, असेही शिखर बँकेने बँकांना कळविले आहे. एटीएम मशिनसंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेत दाखल झालेल्या आहेत. यापैकी प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, अनेक वेळा मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांना आपले व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच अनेक वेळा विविध एटीएममधून ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्याच नोटा असल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे काढायचे असले तरी या प्रकारामुळे जास्त पैसे काढावे लागतात. तसेच ज्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्याची व्यवस्था आहे, त्यातील बहुतांश मशिन्स बंद असल्याचे आढळून येते. अनेक ठिकाणी तर बँकांची दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यावर ते मशिनही बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढच्या मशिनपर्यंत पायपीट करावी लागते. एटीएमच्या प्रसारासाठी बँका मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत, याचे कारण म्हणजे एटीएमवरून होणाऱ्या व्यवहारांमुळे बँकेच्या व्यवहारखर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. यासंदर्भात मध्यंतरी बँकिंग उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जर एखाद्या ग्राहकाने बँकेत येऊन व्यवहार केला तर त्याकरिता बँकेला साधारणपणे (शहरनिहाय) सरासरी ६५ रुपये खर्च येतो. हाच व्यवहार जर त्या ग्राहकाने एटीएमच्या माध्यमातून केला तर त्या व्यवहाराकरिता ३५ रुपयांच्या आसपास खर्च येतो. एटीएमची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावरदेशातील तळागाळातील जनतेपर्यंत वित्तीय व्यवस्थेचे फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने वित्तीय समायोजनाचे धोरण राबविण्यात एटीएमचे योगदान मोलाचे मानले जाते. पण सध्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या अतिशय नगण्य आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमची एकत्रित संख्या ही जेमतेम दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. मध्यंतरी सर्व बँकांचे व्यवहार पार पाडले जातील अशा ‘व्हाइट लेबल’ एटीएमला सरकारने परवानगी दिली होती. मात्र, त्यात फारसा नफा नसल्याने अनेक कंपन्यांनी यामधील गुंतवणूक काढून घेतली आहे. एटीएम बंद असल्यास बँकांवर होणार कारवाईएटीएम मशिनची देखभाल नीट न केल्यास व ती ठरावीक मुदतीपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अहवालाच्या निमित्ताने दिले आहेत.