शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

देशात ३३ टक्के एटीएम निकामी

By admin | Updated: May 26, 2016 02:06 IST

प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा

मुंबई : प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेनेच एका अभ्यासाअंती काढला असून यासंदर्भात बँकांचे कान उपटले आहेत. एटीएमसंदर्भात सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेत यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वत:हून पुढाकार घेत देशातील सुमारे चार हजार एटीएमची तपासणी केली. सर्वेक्षणासाठी चार हजारांचा आकडा हा मोठा असून याआधारेच हा निष्कर्ष काढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या अभ्यासानंतर रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांनी बारकाईने लक्ष देत सर्व मशिन्स नीट व व्यवस्थित सुरू राहतील याबाबत दक्षता घेण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. तसेच रिझर्व्ह बँक या मशिनच्या स्थितीचा नियमितपणे आढावा घेत राहील, असेही शिखर बँकेने बँकांना कळविले आहे. एटीएम मशिनसंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेत दाखल झालेल्या आहेत. यापैकी प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, अनेक वेळा मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांना आपले व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच अनेक वेळा विविध एटीएममधून ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्याच नोटा असल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे काढायचे असले तरी या प्रकारामुळे जास्त पैसे काढावे लागतात. तसेच ज्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्याची व्यवस्था आहे, त्यातील बहुतांश मशिन्स बंद असल्याचे आढळून येते. अनेक ठिकाणी तर बँकांची दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यावर ते मशिनही बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढच्या मशिनपर्यंत पायपीट करावी लागते. एटीएमच्या प्रसारासाठी बँका मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत, याचे कारण म्हणजे एटीएमवरून होणाऱ्या व्यवहारांमुळे बँकेच्या व्यवहारखर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. यासंदर्भात मध्यंतरी बँकिंग उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जर एखाद्या ग्राहकाने बँकेत येऊन व्यवहार केला तर त्याकरिता बँकेला साधारणपणे (शहरनिहाय) सरासरी ६५ रुपये खर्च येतो. हाच व्यवहार जर त्या ग्राहकाने एटीएमच्या माध्यमातून केला तर त्या व्यवहाराकरिता ३५ रुपयांच्या आसपास खर्च येतो. एटीएमची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावरदेशातील तळागाळातील जनतेपर्यंत वित्तीय व्यवस्थेचे फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने वित्तीय समायोजनाचे धोरण राबविण्यात एटीएमचे योगदान मोलाचे मानले जाते. पण सध्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या अतिशय नगण्य आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमची एकत्रित संख्या ही जेमतेम दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. मध्यंतरी सर्व बँकांचे व्यवहार पार पाडले जातील अशा ‘व्हाइट लेबल’ एटीएमला सरकारने परवानगी दिली होती. मात्र, त्यात फारसा नफा नसल्याने अनेक कंपन्यांनी यामधील गुंतवणूक काढून घेतली आहे. एटीएम बंद असल्यास बँकांवर होणार कारवाईएटीएम मशिनची देखभाल नीट न केल्यास व ती ठरावीक मुदतीपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अहवालाच्या निमित्ताने दिले आहेत.