शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

देशात ३३ टक्के एटीएम निकामी

By admin | Updated: May 26, 2016 02:06 IST

प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा

मुंबई : प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेनेच एका अभ्यासाअंती काढला असून यासंदर्भात बँकांचे कान उपटले आहेत. एटीएमसंदर्भात सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेत यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वत:हून पुढाकार घेत देशातील सुमारे चार हजार एटीएमची तपासणी केली. सर्वेक्षणासाठी चार हजारांचा आकडा हा मोठा असून याआधारेच हा निष्कर्ष काढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या अभ्यासानंतर रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांनी बारकाईने लक्ष देत सर्व मशिन्स नीट व व्यवस्थित सुरू राहतील याबाबत दक्षता घेण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. तसेच रिझर्व्ह बँक या मशिनच्या स्थितीचा नियमितपणे आढावा घेत राहील, असेही शिखर बँकेने बँकांना कळविले आहे. एटीएम मशिनसंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेत दाखल झालेल्या आहेत. यापैकी प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, अनेक वेळा मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांना आपले व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच अनेक वेळा विविध एटीएममधून ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्याच नोटा असल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे काढायचे असले तरी या प्रकारामुळे जास्त पैसे काढावे लागतात. तसेच ज्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्याची व्यवस्था आहे, त्यातील बहुतांश मशिन्स बंद असल्याचे आढळून येते. अनेक ठिकाणी तर बँकांची दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यावर ते मशिनही बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढच्या मशिनपर्यंत पायपीट करावी लागते. एटीएमच्या प्रसारासाठी बँका मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत, याचे कारण म्हणजे एटीएमवरून होणाऱ्या व्यवहारांमुळे बँकेच्या व्यवहारखर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. यासंदर्भात मध्यंतरी बँकिंग उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जर एखाद्या ग्राहकाने बँकेत येऊन व्यवहार केला तर त्याकरिता बँकेला साधारणपणे (शहरनिहाय) सरासरी ६५ रुपये खर्च येतो. हाच व्यवहार जर त्या ग्राहकाने एटीएमच्या माध्यमातून केला तर त्या व्यवहाराकरिता ३५ रुपयांच्या आसपास खर्च येतो. एटीएमची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावरदेशातील तळागाळातील जनतेपर्यंत वित्तीय व्यवस्थेचे फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने वित्तीय समायोजनाचे धोरण राबविण्यात एटीएमचे योगदान मोलाचे मानले जाते. पण सध्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या अतिशय नगण्य आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमची एकत्रित संख्या ही जेमतेम दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. मध्यंतरी सर्व बँकांचे व्यवहार पार पाडले जातील अशा ‘व्हाइट लेबल’ एटीएमला सरकारने परवानगी दिली होती. मात्र, त्यात फारसा नफा नसल्याने अनेक कंपन्यांनी यामधील गुंतवणूक काढून घेतली आहे. एटीएम बंद असल्यास बँकांवर होणार कारवाईएटीएम मशिनची देखभाल नीट न केल्यास व ती ठरावीक मुदतीपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अहवालाच्या निमित्ताने दिले आहेत.