शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्के एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:36 IST

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योगधंदे आणि व्यापार पुन्हा सुरू होत असला तरी आपली मर्यादित साधनसामग्री आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे देशातील एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के एमएसएमई हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणामधून निघाले आहेत.

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ४६,५२५ एमएसएमई आणि व्यावसायिक तसेच कंपन्यांचे सीईओ व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यापैकी एमएसएमईमधील ३५ टक्के तर व्यावसायिकांपैकी ३७ टक्के मते ही लॉकडाउनच्या काळामध्ये झालेले नुकसान हे भरून येण्यासारखे नसून त्यामुळे उद्योगांना आपले व्यवसाय गुंडाळण्याखेरीज अन्य काही पर्याय नसल्याचे मत व्यक्त करणारे आहेत. ३२ टक्के एमएसएमर्इंच्या मते हे नुकसान भरून निघण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवघ्या १२ टक्के प्रतिसादकांनी केवळ तीन महिन्यांमध्ये हे नुकसान भरून निघण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.या उद्योगांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासूनच या उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एमएसएमईमधील ३ टक्के, कंपन्यांमधील ६ टक्के आणि ११ टक्के व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटाचा आपल्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. ३२ टक्के सहभागींनी आपला उद्योग या समस्येमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २९ टक्के सहभागितांनी या संकटामधून बाहेर पडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.केवळ कोरोनाच कारणीभूत नाहीच्लॉकडाऊनच्या काळामधील झालेले नुकसान, मर्यादित असलेली साधनसामग्री तसेच भविष्यामधील आॅर्डर मिळण्याबाबतची अनिश्चितता या बाबींमुळे एमएसएमई तसेच अन्य व्यावसायिकांना यापुढे व्यवसाय चालणे कठीण असल्याचे वाटत आहे. मात्र, यासाठी केवळ कोरोनाचे लॉकडाऊन हेच कारण नाही. याआधीपासूनच एमएसएमई व छोट्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच हे उद्योग बंद पडू शकतील, असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या