शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

३३ टक्के एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:36 IST

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योगधंदे आणि व्यापार पुन्हा सुरू होत असला तरी आपली मर्यादित साधनसामग्री आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे देशातील एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के एमएसएमई हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणामधून निघाले आहेत.

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ४६,५२५ एमएसएमई आणि व्यावसायिक तसेच कंपन्यांचे सीईओ व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यापैकी एमएसएमईमधील ३५ टक्के तर व्यावसायिकांपैकी ३७ टक्के मते ही लॉकडाउनच्या काळामध्ये झालेले नुकसान हे भरून येण्यासारखे नसून त्यामुळे उद्योगांना आपले व्यवसाय गुंडाळण्याखेरीज अन्य काही पर्याय नसल्याचे मत व्यक्त करणारे आहेत. ३२ टक्के एमएसएमर्इंच्या मते हे नुकसान भरून निघण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवघ्या १२ टक्के प्रतिसादकांनी केवळ तीन महिन्यांमध्ये हे नुकसान भरून निघण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.या उद्योगांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासूनच या उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एमएसएमईमधील ३ टक्के, कंपन्यांमधील ६ टक्के आणि ११ टक्के व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटाचा आपल्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. ३२ टक्के सहभागींनी आपला उद्योग या समस्येमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २९ टक्के सहभागितांनी या संकटामधून बाहेर पडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.केवळ कोरोनाच कारणीभूत नाहीच्लॉकडाऊनच्या काळामधील झालेले नुकसान, मर्यादित असलेली साधनसामग्री तसेच भविष्यामधील आॅर्डर मिळण्याबाबतची अनिश्चितता या बाबींमुळे एमएसएमई तसेच अन्य व्यावसायिकांना यापुढे व्यवसाय चालणे कठीण असल्याचे वाटत आहे. मात्र, यासाठी केवळ कोरोनाचे लॉकडाऊन हेच कारण नाही. याआधीपासूनच एमएसएमई व छोट्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच हे उद्योग बंद पडू शकतील, असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या