शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:25 IST

छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले होते.

31 Naxlists killed :  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवरुन सुरू करण्यात आलेल्या कारवाईने नक्षलवादी हैराण झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले. रविवारी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात एका टेकडीवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक धोकादायक आणि ११ महिलांचाही समावेश होता.

अबुझमाडला लागून असलेले इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे नक्षलवाद्यांचे महत्त्वाचं ठिकाण आहे. २७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये इंद्रावती नॅशनल पार्कला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र हे बऱ्याच काळापासून नक्षलवाद्याचे आश्रयस्थान बनलं होतं. रविवारी झालेल्या कारवाईत तब्बल ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्याच सुरक्षा दलाला यश आलं. काही दिवसांपूर्वीच या जंगलात तीन नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला होता.

आम्हाला तेलंगणा राज्य समिती, पश्चिम बस्तर विभाग आणि नॅशनल पार्क एरिया कमिटीमधल्या नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यांनी इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेनआधी एक बैठक बोलावली होती. नक्षलवादी मार्च ते जून दरम्यान टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन करतात, ज्या दरम्यान ते त्यांच्या कारवाया वाढवतात.

७ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड पोलिसांच्या तुकड्या, जिल्हा राखीव रक्षक, स्पेशल टास्क फोर्स आणि बस्तर फायटर यांना या भागाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठवण्यात आले होते. "स्ट्रॅटेजी म्हणून सरप्राईज एलिमेंटचा वापर करण्यात आला. इंद्रावती नॅशनल पार्कमधील महाराष्ट्र पोलिसांच्या लॉन्चिंग पॅडवरून काही टीम्सना पाचारण करण्यात आले होते," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी सकाळी गस्ती पथके नक्षलवादी दिसतील अशा टेकडीवर पोहोचली. टेकडीला घेरून सुरक्षा कर्मचारी पुढे जात राहिले आणि सकाळी ८ वाजता गोळीबार सुरू झाला. गोळीबारादरम्यान नक्षलवादी दोन गटात विभागले गेले. तेलंगणा समिती कॅडर असलेल्या एका गटाने माघार घ्यायला सुरुवात केली, तर दुसऱ्या गटाने गोळीबार सुरूच ठेवला. तितक्यात महाराष्ट्राच्या बाजूने घुसलेल्या पथकाला पाहून नक्षलवाद्यांना धक्का बसला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल येईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. संध्याकाळी चारपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.

ही चकमक घडली ते ठिकाण बिजापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० किमी आणि महाराष्ट्र सीमेपासून ४० किमी अंतरावर आहे. तीन दिवसांच्या कारवाईनंतर सुमारे १०० किलोमीटर चालत सुरक्षा दल तिथं पोहोचलं होतं. मारले गेलेले नक्षलवादी, शहीद सैनिक आणि जखमींचे मृतदेह एअरलिफ्ट करण्यात आले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्र