शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:25 IST

छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले होते.

31 Naxlists killed :  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवरुन सुरू करण्यात आलेल्या कारवाईने नक्षलवादी हैराण झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले. रविवारी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात एका टेकडीवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक धोकादायक आणि ११ महिलांचाही समावेश होता.

अबुझमाडला लागून असलेले इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे नक्षलवाद्यांचे महत्त्वाचं ठिकाण आहे. २७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये इंद्रावती नॅशनल पार्कला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र हे बऱ्याच काळापासून नक्षलवाद्याचे आश्रयस्थान बनलं होतं. रविवारी झालेल्या कारवाईत तब्बल ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्याच सुरक्षा दलाला यश आलं. काही दिवसांपूर्वीच या जंगलात तीन नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला होता.

आम्हाला तेलंगणा राज्य समिती, पश्चिम बस्तर विभाग आणि नॅशनल पार्क एरिया कमिटीमधल्या नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यांनी इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेनआधी एक बैठक बोलावली होती. नक्षलवादी मार्च ते जून दरम्यान टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन करतात, ज्या दरम्यान ते त्यांच्या कारवाया वाढवतात.

७ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड पोलिसांच्या तुकड्या, जिल्हा राखीव रक्षक, स्पेशल टास्क फोर्स आणि बस्तर फायटर यांना या भागाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठवण्यात आले होते. "स्ट्रॅटेजी म्हणून सरप्राईज एलिमेंटचा वापर करण्यात आला. इंद्रावती नॅशनल पार्कमधील महाराष्ट्र पोलिसांच्या लॉन्चिंग पॅडवरून काही टीम्सना पाचारण करण्यात आले होते," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी सकाळी गस्ती पथके नक्षलवादी दिसतील अशा टेकडीवर पोहोचली. टेकडीला घेरून सुरक्षा कर्मचारी पुढे जात राहिले आणि सकाळी ८ वाजता गोळीबार सुरू झाला. गोळीबारादरम्यान नक्षलवादी दोन गटात विभागले गेले. तेलंगणा समिती कॅडर असलेल्या एका गटाने माघार घ्यायला सुरुवात केली, तर दुसऱ्या गटाने गोळीबार सुरूच ठेवला. तितक्यात महाराष्ट्राच्या बाजूने घुसलेल्या पथकाला पाहून नक्षलवाद्यांना धक्का बसला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल येईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. संध्याकाळी चारपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.

ही चकमक घडली ते ठिकाण बिजापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० किमी आणि महाराष्ट्र सीमेपासून ४० किमी अंतरावर आहे. तीन दिवसांच्या कारवाईनंतर सुमारे १०० किलोमीटर चालत सुरक्षा दल तिथं पोहोचलं होतं. मारले गेलेले नक्षलवादी, शहीद सैनिक आणि जखमींचे मृतदेह एअरलिफ्ट करण्यात आले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्र