शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाचा चेहरा झाला विद्रूप; डॉक्टरांनी 300 टाके अन् सर्जरी करून केला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 11:16 IST

सरकारी एसएसजी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून ही सर्जरी अत्यंत यशस्वी झाली आहे. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली

नवी दिल्ली - अस्वलाच्या हल्ल्यात पूर्णपणे विद्रूप झालेला तरुणाचा चेहरा डॉक्टरांनी तब्बल 300 टाके अन् सर्जरी करून ठीक केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी एसएसजी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून ही सर्जरी अत्यंत यशस्वी झाली आहे. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली. छोटा उदेपूर येथील पाविजेतपूर तालुक्यातील अंबापूर गावात राहणारा 26 वर्षीय धर्मेश राठवा हा 1 जानेवारी रोजी गावातील शेतात गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला.

अस्वलाने केलेल्या हल्ल्यामध्ये धर्मेशच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. चेहऱ्याचा जवळपास प्रत्येक भाग गंभीर जखमी झाला होता. त्याला त्यानंतर तातडीने जखमी अवस्थेत वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खरंतर, त्याच्या चेहऱ्याचा एक तृतीयांश भाग पूर्णपणे खराब झाला होता. पण डॉक्टरांनी केलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर आता तो नीट बरा झाला आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख आणि SSG हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेश कुमार सोनी यांनी याबाबत माहिती दिली. 

तब्बल चार तास केली शस्त्रक्रिया 

"जेव्हा तरुणाला आमच्याकडे आणण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बिया, धूळ, पानं आणि दगडही रोवले गेले होते. सुरुवातीला आम्हाला त्याला रेबीज, टिटॅनस आणि अँटीबायोटिक शॉट्स द्यावे लागले, चेहऱ्याची पुनर्रचना करण्यासाठी ऑपरेशन करण्यापूर्वी सीटी-स्कॅन करावं लागलं" असं म्हटलं आहे. डॉ. सोनी यांनी डॉ. भाग्यश्री देशमाणकर, डॉ. नलिन प्रजापती, डॉ. सुदर्शन यादव आणि डॉ. रिद्धी सोमपुरा यांच्यासह तब्बल चार तास या व्यक्तीची शस्त्रक्रिया केली. तरुणाचं नाकही श्वसनमार्गापासून पूर्णपणे वेगळं झालेलं होतं. चार तास चाललेल्या या सर्जरीत व्यक्तीच्या चेहऱ्यावर 300 टाके टाकण्यात आले.

"हाडांचे सर्व भाग एकत्र करणं हे एक कोडं होतं"

तरुणाची नाकाची रचना पूर्णपणे खराब झालेली असल्याने डॉक्टर कविता लालचंदानी, डॉ. नेहा शाह आणि डॉ. रिमा गोमेटी यांचा समावेश असलेल्या भूलतज्ज्ञांच्या टीमला संपूर्ण आव्हानात्मक शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला बेशुद्ध ठेवण्यासाठी थांबावे लागले. "आम्ही त्वचेचा काही भाग व्यवस्थित मिळवला. उर्वरित चेहऱ्याच्या पुनर्रचनेसाठी टायटॅनियम प्लेट्स आणि जाळी वापरली. हाडांचे सर्व भाग एकत्र करणं हे एक कोडं होतं" असं देखील डॉ. सोनी यांनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल