शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

300 काश्मिरी पंडित पुन्हा येणार खोऱ्यात, तीन दशकांनंतर करणार पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 08:16 IST

दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे.

श्रीनगरः दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळच्या खीर भवानी आईच्या पूजेसाठी या काश्मिरी पंडितांना आमंत्रण पाठवलं आहे. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर काश्मिरी पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. या संधीकडे घरवापसीच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे.सात लाख एवढी लोकसंख्या असलेले काश्मिरी पंडित 1990चा काळ विसरू शकत नाहीत. 30 वर्षांची दीपिका सांगते, आता आमची घरवापसी नाही, परंतु आम्हाला पुन्हा काश्मिरात वास्तव्य करायला मिळेल, अशी आशा आहे. आई भवानीचं दर्शन करणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काश्मीरच्या तरुण पिढीसाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण काश्मीरच्या तरुण पिढीनं काश्मिरी पंडितांना कधीही पाहिलेलं नाही.58 वर्षीय दीपक कौल आणि त्यांची पत्नी भारती कौल यांनी स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. ही काही दिवसांची यात्रा कौल कुटुंबीयांना घरवापसीसारखीच वाटत आहे. 1990च्या नरसंहारानंतर रातोरात घर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांसाठी हा दिवस अविस्मरणीय आहे. जम्मू-काश्मीर भवनापासून ही यात्रा 10 जून रोजी आई खीर भवानीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. प्रवाशांचा खर्च आणि सुरक्षेची जबाबदारी राज्यपालांनी घेतली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारला प्रवाशांची संख्या आधीच सोपवलेली आहे. खीर भवानी आईच्या दर्शनानंतर हरी पर्वत श्रीनगर, शंकराचार्य मंदिर असा प्रवास करत हे यात्रेकरू पुन्हा 13 जून रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर