शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

३० हजार लोकांच्या नोक-या धोक्यात; कमी वेतनावर रोजगार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:43 IST

दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.

बंगळुरू/नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.टीमलीज सर्व्हिसेस, मॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेस, एबीसी कन्सल्टंट्स, रँडस्टँड इंडिया आणि कोर्न फेरी यांनी ही माहिती दिली. जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रातील परिस्थिती बदलली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने वायरलेस व्यवसाय बंद केला आहे. टाटा समूहाने व्यवसाय भारती एअरटेलला विकला आहे. या प्रक्रियेत १२ महिन्यांत २० हजार ते ३० हजार लोकांना रोजगार गमवावा लागेल.टीमलीज सर्व्हिसेसचे रितूपर्ण चक्रवर्ती यांनी सांगितले की, जे लोक पायाभूत सेवा व नेटवर्किंग इंजिनीअरिंग, विक्री व वितरण, दूरसंचार अभियांत्रिकी, एचआर, वित्त, कॉल सेंटर आणि अन्य सहायक क्षेत्रात काम करीत आहेत, त्यांच्या नोकºयांना धोका आहे. दूरसंचार क्षेत्रावर तब्बल ८ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे.एबीसी कन्सल्टंट्सचे विवेक मेहता म्हणाले की, एकीकरण प्रक्रिया व खर्चकपात यात रोजगाराचा बळी जाणार आहे. मध्यम ते वरिष्ठ व्यवस्थापकांच्या नोकºयांना अधिक धोका आहे.कोर्न फेरी इंडियाचे गौरव बर्मन यांनी सांगितले की, दूरसंचार उद्योग सॉफ्टवेअर आधारित नेटवर्क व इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेस तसेच विक्री व वितरण या विभागातील नोकºयांत कपात होईल. (वृत्तसंस्था)मोठा पगार घेणारे संकटातमॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक ए. जी. राव यांनी सांगितले की, ४० हजार ते काही लाख इतके वेतन घेणाºया तंत्रज्ञ आणि अभियंत्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळू शकते. नोकºया टिकविण्यासाठी अथवा नव्या नोकºया मिळविण्यासाठी या लोकांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील.

टॅग्स :Indiaभारत