शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:24 IST

देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नवी दिल्ली : देशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १४,१४६ रुग्ण आढळले तर १४४ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,५२,१२४ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात लसीकरणाची १०० काेटी डाेसकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी हाेताना दिसत आहे. मात्र, अधूनमधून रुग्णसंख्या वाढत असल्याचेही आढळते. देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १,९५,८४६ असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण ०.५७ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासात ५,७८६ ने घट झाली. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ९७.६५ कोटी कोविड लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.शनिवारी ११,००,१२३ चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे देशात एकूण चाचण्यांची संख्या ५९,०९,३५,३८१ झाल्या. कोरोनातून आतापर्यंत ३,३४,१९,७४९ लोक बरे झाले असून रुग्ण मरण पावण्याचा दर हा १.३३ टक्के आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट, २०२० रोजी पूर्ण केला होता. ३० लाखांचा २३ ऑगस्ट, ४० लाखांचा ५ सप्टेंबर तर १६ सप्टेंबर, २०२० रोजी ५० लाखांची पायरी ओलांडली होती. ६० लाखांचा टप्पा २८ सप्टेंबर, ७० लाखांचा ११ ऑक्टोबर, ८० लाखांचा टप्पा २९ ऑक्टोबर, ९० लाखांचा २० नोव्हेंबर आणि एक कोटींचा टप्पा १९ डिेसेंबर रोजी ओलांडला होता. यावर्षी ४ मे रोजी २ कोटींचा टप्पा पार केला.देशात १८ वर्षांखालील मुलांच्या काेराेना लसीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत संशाेधनातील निष्कर्ष आणि लसींच्या साठ्याची उपलब्धता याबाबत विचार करून परवानगी देण्यात येईल. - व्ही. के. पाॅल, काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख  ’अधिक सवलतीबाबत निर्णय दिवाळीनंतर’ जालना : लसीचा एक डोस घेतल्यानंतर नागरिकांना मॉल प्रवेश, रेल्वे प्रवासाची सवलत देण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर आरोग्य विभाग व टास्क फोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री घेतील. दिवाळीनंतर आढळणारी बाधितांची संख्या व सेतू ॲपमध्ये व्यक्तीचे स्टेटस सेफ असणे गरजेचे असेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. धोका टळलेला नाही भारतात १८ वर्षांवरील सुमारे ७० काेटी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेतला आहे, तर २८ काेटी नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. हे प्रमाण अनुक्रमे ७३ आणि ३० टक्के आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या कमीच असल्याने हे युद्ध संपलेले नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख व्ही. के. पाॅल यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये दाेनपेक्षा अधिक काेराेनाच्या लाटा आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी हाेत असली तरीही वाईट काळ संपला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भीती घालविण्यासाठी खेर यांचे विशेष गाणे कोरोना-१९ विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीबद्दल पसरलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा व्हाव्यात म्हणून गायक व संगीतकार कैलाश खेर यांनी बनवलेले गीत केंद्र सरकारने शनिवारी जारी केले. ३.३० मिनिटांचे हे गीत आणि व्हिडिओ दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. या गीतामुळे लसीबद्दलची नकाराची भावना नाहीशी होईल आणि लस देशाला सुरक्षित राखेल, असे हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटवर म्हटले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या