शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:36 IST

मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे.

मणिपूरमध्ये ४ महिन्यांपासून हिंसाचार सुरुच आहे. लोकसभेतही मुद्दा उपस्थित करून त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीय. आजही तेथील लाखो लोक सरकारी आसरा केंद्रांत राहत आहेत. कुकी समाजाने आता वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली आहे. मैतेई समाजासोबत राहणे आमच्यासाठी मृत्यू समान असल्याचे कुकी समाजाचे म्हणणे आहे. 

मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे. यातच २९ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे, त्यातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याचा उल्लेख केला होता. राज्यात वेगळ्या प्रशासनाची मागणी आहे, पण मणिपूरच्या प्रादेशिक अखंडतेशी आम्ही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले होते. 

1972 मध्ये मणिपूर पूर्ण राज्य बनले. यानंतर सुमारे 8 वर्षांनी म्हणजे 1980 मध्ये स्वतंत्र कुकीलँडची मागणी सुरू झाली. त्यावेळी कुकी-झोमी बंडखोरांची पहिली आणि सर्वात मोठी संघटना कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच KNO अस्तित्वात आली होती. 2012 मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी मान्य होणार हे कळताच कुकी राज्य मागणी समिती म्हणजेच KSDC संघटनेने कुकीलँडसाठी आंदोलनाची घोषणा केली. तेव्हापासून ही संघटना वेळोवेळी संप आणि बंद पुकारत मणिपूरमध्ये मालवाहतूक रोखण्याचे काम केले जात आहे. 

मणिपूर 22,327 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. KSDC ने 60% पेक्षा जास्त म्हणजे 12,958 किमी क्षेत्र कुकीलँड बनवण्याची मागणी केली आहे. कुकीलँडमधील सदर हिल्स इंफाळ खोऱ्याला तीन बाजूंनी वेढतात. मणिपूरमधील कुकी समाज प्रामुख्याने डोंगररांगांत राहतो. मणिपूरची एकूण लोकसंख्या २८.५ लाख आहे, त्यापैकी ३०% कुकी आहेत.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार