शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:36 IST

मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे.

मणिपूरमध्ये ४ महिन्यांपासून हिंसाचार सुरुच आहे. लोकसभेतही मुद्दा उपस्थित करून त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीय. आजही तेथील लाखो लोक सरकारी आसरा केंद्रांत राहत आहेत. कुकी समाजाने आता वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली आहे. मैतेई समाजासोबत राहणे आमच्यासाठी मृत्यू समान असल्याचे कुकी समाजाचे म्हणणे आहे. 

मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे. यातच २९ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे, त्यातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याचा उल्लेख केला होता. राज्यात वेगळ्या प्रशासनाची मागणी आहे, पण मणिपूरच्या प्रादेशिक अखंडतेशी आम्ही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले होते. 

1972 मध्ये मणिपूर पूर्ण राज्य बनले. यानंतर सुमारे 8 वर्षांनी म्हणजे 1980 मध्ये स्वतंत्र कुकीलँडची मागणी सुरू झाली. त्यावेळी कुकी-झोमी बंडखोरांची पहिली आणि सर्वात मोठी संघटना कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच KNO अस्तित्वात आली होती. 2012 मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी मान्य होणार हे कळताच कुकी राज्य मागणी समिती म्हणजेच KSDC संघटनेने कुकीलँडसाठी आंदोलनाची घोषणा केली. तेव्हापासून ही संघटना वेळोवेळी संप आणि बंद पुकारत मणिपूरमध्ये मालवाहतूक रोखण्याचे काम केले जात आहे. 

मणिपूर 22,327 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. KSDC ने 60% पेक्षा जास्त म्हणजे 12,958 किमी क्षेत्र कुकीलँड बनवण्याची मागणी केली आहे. कुकीलँडमधील सदर हिल्स इंफाळ खोऱ्याला तीन बाजूंनी वेढतात. मणिपूरमधील कुकी समाज प्रामुख्याने डोंगररांगांत राहतो. मणिपूरची एकूण लोकसंख्या २८.५ लाख आहे, त्यापैकी ३०% कुकी आहेत.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार