शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:50 IST

खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू ( Marathi News ): राजौरीतील अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर घटनास्थळी तीन नागरिकांचे मृतदेह आढळल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने  राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर पी. आचार्य यांच्यासह  कर्नल व लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली.

राजौरीत सुरक्षा दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर टोपा पीर गावातील सफीर हुसैन, मोहम्मद शौकत व शब्बीर अहमद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  त्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले. सुरक्षा दलाच्या ताब्यात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली.

लष्करप्रमुखांची भेट

गेल्या आठवड्यात पूंछमध्ये ५ जवान शहीद झाल्यानंतर अतिरेक्यांचा शोध सुरू असताना, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. लष्करी जवान, अधिकाऱ्यांना अत्यंत व्यावसायिक पद्धतीने मोहीम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. 

वर्षभरात १३४ मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये २०२३ या वर्षभरात झालेल्या विविध घटनांमध्ये ८५ अतिरेकी, ३५ जवान आणि १४ नागरिकांचा मृत्यू झाला. खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान