शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:50 IST

खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू ( Marathi News ): राजौरीतील अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर घटनास्थळी तीन नागरिकांचे मृतदेह आढळल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने  राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर पी. आचार्य यांच्यासह  कर्नल व लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली.

राजौरीत सुरक्षा दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर टोपा पीर गावातील सफीर हुसैन, मोहम्मद शौकत व शब्बीर अहमद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  त्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले. सुरक्षा दलाच्या ताब्यात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली.

लष्करप्रमुखांची भेट

गेल्या आठवड्यात पूंछमध्ये ५ जवान शहीद झाल्यानंतर अतिरेक्यांचा शोध सुरू असताना, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. लष्करी जवान, अधिकाऱ्यांना अत्यंत व्यावसायिक पद्धतीने मोहीम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. 

वर्षभरात १३४ मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये २०२३ या वर्षभरात झालेल्या विविध घटनांमध्ये ८५ अतिरेकी, ३५ जवान आणि १४ नागरिकांचा मृत्यू झाला. खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान