शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:50 IST

खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू ( Marathi News ): राजौरीतील अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर घटनास्थळी तीन नागरिकांचे मृतदेह आढळल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने  राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर पी. आचार्य यांच्यासह  कर्नल व लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली.

राजौरीत सुरक्षा दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर टोपा पीर गावातील सफीर हुसैन, मोहम्मद शौकत व शब्बीर अहमद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  त्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले. सुरक्षा दलाच्या ताब्यात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली.

लष्करप्रमुखांची भेट

गेल्या आठवड्यात पूंछमध्ये ५ जवान शहीद झाल्यानंतर अतिरेक्यांचा शोध सुरू असताना, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. लष्करी जवान, अधिकाऱ्यांना अत्यंत व्यावसायिक पद्धतीने मोहीम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. 

वर्षभरात १३४ मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये २०२३ या वर्षभरात झालेल्या विविध घटनांमध्ये ८५ अतिरेकी, ३५ जवान आणि १४ नागरिकांचा मृत्यू झाला. खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान