शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 06:10 IST

हत्येसाठी कलम ३०२ ऐवजी लागणार १०३, नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे.

नवी दिल्ली : देशभरात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) मध्ये ५११ कलमे होती. मात्र, भारतीय न्याय संहितेत ३५८ कलमे आहेत. गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे.

देशात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेले तीन गुन्हेगारी कायदे १ जुलैपासून बदलणार आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेले कायदे आता देशभरात लागू होणार आहेत. तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत. हे कायदे आता भारतीय दंड संहिता (१८६०), गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (१८९८) आणि भारतीय साक्ष अधिनियम (१८७२) यांची जागा घेतील.

नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाइन फाईलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसामपर्यंत संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था लागू होईल.

न्यायदानाची प्रक्रिया हाेणार वेगवानन्यायाधीश किंवा लोकसेवकाविरोधात खटला चालविण्यासाठी १२० दिवसांमध्ये राज्य शासनाला कळवावे लागेल. न कळविल्यास सरकारची सहमती असल्याचे गृहित धरले जाईल. तब्बल ३५ कलमांमध्ये टॉईम बॉण्ड आखून देण्यात आला आहे. बलात्कार, अत्याचाराच्या गुन्ह्यात सात दिवसांमध्ये तपास अधिकाऱ्याला मेडिकल रिपोर्ट पाठवावा लागेल. ९० दिवसांमध्ये पीडितेला तपासातील प्रगतीबाबत कळवावे लागेल. सामान्यांना गुन्ह्यातील आरोपी सापडल्यास, पकडल्यास सहा तासांच्या आत जवळील ठाण्यात हजर करणे बंधनकारक. आत्म्हत्येत प्रथमदर्शनी कारणांचा अहवाल २४ तासांत पाठवणे बंधनकारक.

नागरी सुरक्षेसंदर्भातील कायद्यात काय आहेत महत्त्वाचे बदल?

कलम १२४ आयपीसीच्या कलम १२४ मध्ये राजद्रोहाशी संबंधित प्रकरणात शिक्षेची तरतूद आहे. नवीन कायद्यानुसार राजद्रोहाला आता देशद्रोह संबोधण्यात येईल. ब्रिटिश काळातील शब्द हटविण्यात आला आहे. 

कलम १४४  आयपीसीचे कलम १४४ हे घातक शस्त्रे बाळगणे आणि बेकायदेशीर सभेमध्ये सहभागी होणे यांच्याशी संबंधित होते. आता भारतीय न्याय संहितेत परिशिष्ट ११ मध्ये याला सार्वजनिक शांततेविरुद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. आता भारतीय न्याय संहितेचे कलम १८७ हे बेकायदेशीर सभेबाबत आहे.

कलम ३०२ यापूर्वी हत्येच्या प्रकरणात कलम ३०२ नुसार आरोपी करण्यात येत होते. मात्र, आता अशा गुन्ह्यांसाठी कलम १०३ नुसार शिक्षा देण्यात येणार आहे. 

कलम ३०७  हत्येच्या प्रयत्नात अगोदर आयपीसीच्या कलम ३०७ नुसार शिक्षा देण्यात येत होती. आता अशा दोषींना भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ नुसार शिक्षा सुनावण्यात येईल. हे कलम परिशिष्ट ६ मध्ये ठेवण्यात आले.

कलम ३७६  अत्याचाराचा गुन्हा हा पूर्वी आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत होता. भारतीय न्याय संहितेत याला परिशिष्ट ५ मध्ये महिला व मुलांविरुद्धच्या गुन्ह्याच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. नव्या कायद्यात अत्याचाराशी संबंधित गुन्ह्याची शिक्षा आता कलम ६३ अंतर्गत येईल. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा आयपीसीच्या कलम ३७६ ऐवजी कलम ७० मध्ये येईल.

कलम ३९९   अगोदर मानहानी प्रकरणात आयपीसीचे कलम ३९९ नुसार कारवाई होत होती. नव्या कायद्यात परिशिष्ट १९ अंतर्गत गुन्हेगारी स्वरुपाची धमकी, अपमान, मानहानी आदी प्रकरणात याला स्थान देण्यात आले आहे. मानहानीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ मध्ये ठेवण्यात आले आहे.

कलम ४२०  भारतीय न्याय संहितेत फसवणुकीचा गुन्हा ४२० मध्ये नव्हे तर, ३१६ नुसार असेल. हे कलम भारतीय न्याय संहितेच्या परिशिष्ट १७ मध्ये संपत्तीची चोरी या गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले आहे.