शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

९० दिवसांत ३ कोटी लोकांना मिळाली नोकरी; अनेक क्षेत्रांत संधी, कामगार मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 08:52 IST

कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटातही सध्या काही क्षेत्रांमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. देशातील प्रमुख ९ क्षेत्रांत नोकऱ्या उपलब्ध झाल्या असून, जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ३ कोटींपेक्षा अधिक जणांना रोजगाराची संधी मिळाली असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.

कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान नऊ क्षेत्रांमध्ये ३.१० कोटी रोजगार निर्माण झाले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार कार्यालयाने तयार केलेले तिमाही सर्वेक्षण जाहीर केले.

दुसरा अहवाल

कामगार मंत्रालयाचा हा नोकऱ्यांबाबतचा दुसरा अहवाल आहे. पहिला अहवाल एप्रिल-जून २०२१ मध्ये सादर करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये १० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता.

या क्षेत्रांत आहे नोकरीची संधी

उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, हॉटेल, आयटी, बीपीओ आणि आर्थिक सेवा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी निर्माण झाल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यांनी लॉकडाऊन हटविल्याने आर्थिक सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत