शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:25 IST

2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. 

नवी दिल्ली - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 2जी घोटाळा प्रकरणात जोरदार आघाडी उघडली होती. आता निकालानंतर आपण न्यायालयाच्या निर्णयामुळे निराश झालेलो नाही. सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसलेल्या स्वामी यांनी सीबीआयवर तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तसेच या अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. मात्र या निर्णयानंरही भ्रष्टाचाराविरोधातील आपली लढाई सुरू राहणार असून, आजपासून भ्रष्टाचाराविरोधात युद्धस्तरावर लढण्याचा निर्णय झाला पाहिजे, त्यासाठी मी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी यांनी जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचेही उदाहरण देत आपला विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "या निर्णयाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही असाच निर्णय आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय पलटवून लावत जयललिता यांना दोषी ठरवले होते." आपण या खटस्याचे निकालपत्र अद्याप वाचलेले नाही. ते वाचल्यानंतर याप्रकरणातील पुढील भूमिका आपण ठरवू असेही त्यांनी सांगितले.  

संपूर्ण देशाला हादरवणा-या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमके नेत्या व खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना आज दोषमुक्त केले. सीबीआयची दोन प्रकरण व  अंमलबजावणी संचालनालयाच्या एका प्रकरणावर गुरुवारी (21 डिसेंबर) सुनावणी झाली.  1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तत्कालीन यूपीए सरकारमधील दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह अनेक आरोपी होते.  

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळाIndiaभारत