शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus: भारतात हवाई उद्योगातील २९ लाख रोजगार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:58 IST

सरकारने तातडीने या विमान कंपन्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ओतली नाही, तर आणखीही काही कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.’

कोरोना विषाणूच्या (कोविड−१९) उद्रेकामुळे जगभरातच विमान उद्योग बंद पडल्यासारखा असून, भारतात यावर्षी या उद्योगातील २९.३२ लाखरोजगार संकटात सापडले आहेत, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) म्हटले. आयएटीएचे विभागीय उपाध्यक्ष (आशियापॅसिफिक ) कॉनरॅड क्लिफोर्ड यांनी म्हटले की, ‘या भागातील विमान कंपन्यांचा २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत ६१ अब्ज डॉलर्सचा रोखीचा व्यवहार झालाच नाही. या भागात आम्ही पहिल्या विमान कंपनीचा बळी गेल्याचे पाहिले. सरकारने तातडीने या विमान कंपन्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ओतली नाही, तर आणखीही काही कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.’क्लिफर्ड यांनी भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांनी प्राधान्याने कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोविड−१९ साथीमुळे जगातील विमान कंपन्यांचा प्रवासी महसूल २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ५५ टक्क्यांनी म्हणजे ३१४ अब्ज डॉलर्सने घसरलेला असण्याची अपेक्षा आहे. आशिया पॅसिफिकमधील विमान कंपन्यांचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त म्हणजे ११३ अब्ज डॉलर्सने खाली आलेला असेल.>महसुलात होईल घटआशिया पॅसिफिक देशांत भारतीय विमान उद्योगाला नोक ऱ्यांचा विचार करता फारच मोठा फटका बसेल, असे आकडेवारी सांगते. यामुळे २९लाख ३२ हजार ९०० नोक-यांवर परिणाम होईल, असे आयएएटीएच्या अहवालात म्हटले. भारताचा या क्षेत्रातील महसूलही २०१९ च्या तुलनेत ११.२२१ दशलक्ष डॉलर्सने खाली आलेला असेल. याशिवाय प्रवाशांची मागणीही भारतात ४७ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या