शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 13:48 IST

दोन तास लंच, त्यानंतर गाठतात घर; २९ IPS अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर डीजीपींचं बोट

भोपाळ: पोलीस महासंचालक विवेक जोहरी यांच्या एका पत्रामुळे सध्या पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. जोहरी यांच्या पत्रानं पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी कार्यालयात येतच नाहीत. तरीही वेतन घेतात. तर कार्यालयात येणारे काही अधिकारी दोन-दोन तास जेवत बसतात आणि जेवण होताच घर गाठतात, असे अतिशय गंभीर आरोप जोहरींनी त्यांच्या पत्रातून केले आहेत.मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक असलेल्या विवेक जोहरी यांनी त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर पत्रातून बोट ठेवलं आहे. भोपाळमधील पोलीस मुख्यालयातील २९ अधिकाऱ्यांबद्दल जोहरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. '२९ पैकी १४ अधिकाऱ्यांना लंचसाठी २ तास लागतात. काही अधिकारी तर लंच होताच कार्यालयाचून निघून जातात. त्यानंतर ते कार्यालयात परततच नाहीत. तीन अधिकारी तर कार्यालयात येतच नाहीत. कोणतंही काम न करता ते वेतन आणि सर्व सरकारी सुविधा घेतात,' असं जोहरींनी पत्रात नमूद केलं आहे.डीजीपींनी त्यांच्या पत्रात २९ अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला आहे. 'कामाच्या वेळेत अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित नसतात. काही अधिकारी लंचनंतर कार्यालयात येतच नाहीत,' असं जोहरींनी ६ जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी कामाला महत्त्व द्यावं. सर्व अधिकाऱ्यांनी सकाळी साडे दहा ते साडे पाच वेळेत कार्यालयात रहावं, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. स्पेशल डीजी, एडीजी आणि आयजी दर्जाचे अधिकारी कार्यालयात बसत नाहीत. फोन घेत नाहीत, हे खेदजनक आहे, अशा शब्दांत जोहरींनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. जोहरींनी त्यांच्या पत्रातून २९ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे लक्ष वेधलं आहे. 'तीन अधिकारी कार्यालयातच येत नाहीत. १२ जण लंचनंतर कार्यालयात परतत नाहीत. १४ अधिकाऱ्यांना लंच करायला २ तास लागतात,' अशी आकडेवारी डीजीपींनी पत्रात दिली आहे. मात्र त्यांनी कोणाचंही नाव पत्रात नमूद केलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीचा त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. भविष्यात हे अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील, अशी अपेक्षा जोहरींनी व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणारबापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणारमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी