शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 13:48 IST

दोन तास लंच, त्यानंतर गाठतात घर; २९ IPS अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर डीजीपींचं बोट

भोपाळ: पोलीस महासंचालक विवेक जोहरी यांच्या एका पत्रामुळे सध्या पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. जोहरी यांच्या पत्रानं पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी कार्यालयात येतच नाहीत. तरीही वेतन घेतात. तर कार्यालयात येणारे काही अधिकारी दोन-दोन तास जेवत बसतात आणि जेवण होताच घर गाठतात, असे अतिशय गंभीर आरोप जोहरींनी त्यांच्या पत्रातून केले आहेत.मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक असलेल्या विवेक जोहरी यांनी त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर पत्रातून बोट ठेवलं आहे. भोपाळमधील पोलीस मुख्यालयातील २९ अधिकाऱ्यांबद्दल जोहरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. '२९ पैकी १४ अधिकाऱ्यांना लंचसाठी २ तास लागतात. काही अधिकारी तर लंच होताच कार्यालयाचून निघून जातात. त्यानंतर ते कार्यालयात परततच नाहीत. तीन अधिकारी तर कार्यालयात येतच नाहीत. कोणतंही काम न करता ते वेतन आणि सर्व सरकारी सुविधा घेतात,' असं जोहरींनी पत्रात नमूद केलं आहे.डीजीपींनी त्यांच्या पत्रात २९ अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला आहे. 'कामाच्या वेळेत अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित नसतात. काही अधिकारी लंचनंतर कार्यालयात येतच नाहीत,' असं जोहरींनी ६ जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी कामाला महत्त्व द्यावं. सर्व अधिकाऱ्यांनी सकाळी साडे दहा ते साडे पाच वेळेत कार्यालयात रहावं, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. स्पेशल डीजी, एडीजी आणि आयजी दर्जाचे अधिकारी कार्यालयात बसत नाहीत. फोन घेत नाहीत, हे खेदजनक आहे, अशा शब्दांत जोहरींनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. जोहरींनी त्यांच्या पत्रातून २९ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे लक्ष वेधलं आहे. 'तीन अधिकारी कार्यालयातच येत नाहीत. १२ जण लंचनंतर कार्यालयात परतत नाहीत. १४ अधिकाऱ्यांना लंच करायला २ तास लागतात,' अशी आकडेवारी डीजीपींनी पत्रात दिली आहे. मात्र त्यांनी कोणाचंही नाव पत्रात नमूद केलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीचा त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. भविष्यात हे अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील, अशी अपेक्षा जोहरींनी व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणारबापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणारमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी