शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 10:58 IST

दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता

नवी दिल्ली - सोमवारी मोदी सरकारने काश्मीरातून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे देशभरातून नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आहे. राज्यात वेगळं निशाण फडकवता येणार नाही. कलम 370 हटविणे हे भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासन होतं. तसेच वर्षोनुवर्ष ही मागणी भाजपाने लावून धरली होती. 

70 वर्षापूर्वी करण्यात आलेली चूक मोदींनी दुरुस्त केली असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत लाल चौकात तिरंगा फडकवताना नरेंद्र मोदी दिसत आहेत. हा तिरंगा फडकवताना मोदींनी दहशतवाद्यांना आव्हान दिलं होतं. 

या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात की, मला आठवतंय की, 1992 मध्ये तिरंगा फडकविण्यासाठी मी काश्मीरला गेलो होतो. त्यावेळी दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरु होता. दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता. देशाच्या ध्वजाचा अपमान केला जात होता. तिरंगा ध्वजाने बूट साफ केले जात होते. ही सगळं दृश्य पाहून मनात आग भडकत होती. तेव्हा आम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढण्याचं ठरवलं. 26 जानेवारीला लालचौकात तिरंगा फडकविणार हे निश्चित झालं.

दहशतवाद्यांना हे कळाल्यानंतर श्रीनगरच्या प्रत्येक भिंतीवर पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर लिहिलं होतं की, जर कोणी आपल्या आईचं दूध प्यायलं असेल तर 26 जानेवारीला लाल चौकात तिरंगा फडकवून पुन्हा जिवंत जाऊन दाखवावं अशी धमकी दिली होती.त्यावेळी मी हैदराबादच्या सभेत मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता श्रीनगरमधील लाल चौकात येणार आहे. मी बुलेटप्रूफ जॅकेट घालणार नाही किंवा बुलेटप्रुफ कारमधून येणार नाही. माझ्या हातात तिरंगा असेल. फैसला 26 जानेवारीलाच होईल असं सांगितलं. त्यानंतर मी ठरलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत लाल चौकात जाऊन तिरंगा फडकविला असं नरेंद्र मोदींनी सांगितले.   

 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतterroristदहशतवादी