शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

नेपाळमध्ये बस दरीत कोसळली, जळगावच्या २७ भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:50 IST

अयाेध्येला रामकथेसाठी गेले हाेते; पुढे देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

काठमांडू/जळगाव : अयाेध्येला रामकथा आटाेपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत असलेल्या नेपाळमधील मर्त्स्यांगडी नदीमध्ये सकाळी ११ वाजता काेसळली. या अपघातात २७ भाविकांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हाेते. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

वरणगाव (भुसावळ) परिसरातील ४१ भाविक १० दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले हाेते. महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या १०४ भाविकांमध्ये त्यांचा समावेश हाेता.  काठमांडूला बसने (यूपी५३-एफटी७६२३) जात होते. चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल १५० फुट खाेल दरीत काेसळली. त्या बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण उपचारादरम्यान दगावले. बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. 

पंतप्रधान माेदी यांनी व्यक्त केले दु:खनेपाळमधील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शाेक व्यक्त केला. अपघातात भाविकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, अशा शब्दांत माेदी यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे पथक पाठवले : मुख्यमंत्रीनेपाळ दुर्घटनेत जळगावचे काही नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना योग्य ती मदत राज्य शासनाच्यावतीने पोहोचविली जाईल. त्यांच्या मदतीसाठी आमदार व अधिकाऱ्यांना नेपाळ येथे पाठविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

१६ मृतांची ओळख पटलीजळगावमधील २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला राणे (वय ४२), भारती जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप सरोदे (४५), पल्लवी सरोदे (४३), अनुप सरोदे (२२), गणेश भारंबे (४०), नीलिमा धांडे (५७), पंकज भंगाळे (४५), परी भारंबे (८), अनिता पाटील, विजया जावळे (५०), रोहिणी जावळे (५१), प्रकाश कोळी यांचा समावेश आहे.

बेळी (ता. जळगाव) येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी जळगाव आणि तसेच इतर ठिकाणांहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी दोन बसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली. 

मुख्य सचिवांना आदेश : फडणवीसनेपाळ येथील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा समावेश आहे. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय केला असून सगळी मदत देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यू.पी. सरकारच्या माध्यमातून मृतदेह आणले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मदतकार्यात अडथळे : गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांचा प्रवाह आणखी वेगवान झाला असून बचावकार्य जिकिरीचे झाले आहे.

दूतावासाशी संपर्क : ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच, नेपाळच्या सीमेवरील उत्तर प्रदेशच्या  महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 

टॅग्स :NepalनेपाळAccidentअपघात