शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

छत्तीसगडमधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:03 IST

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे.

रायपूर, दि. 19 -  छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं याप्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दुर्ग क्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालक हरीश वर्मा यांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील गौसेवा आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  गोशाळेत होती प्रचंड अस्वच्छता काबरा यांनी सांगितले की, वर्माविरोधात छत्तीसगड कृषि-पशु संरक्षण कायदा 2004नुसार  द्यानुसार कलम 4 व 6 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960नुसार 11 आणि भादवि कलम 409 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गौसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईदेखील पसरल्याची माहिती समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणा-या राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत 27 गायींचा मृत्यू झाला आहे.  

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशु वैद्यांचं पथक घटनेच्या चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. शिवाय, उपविभागीय दंडाधिका-यांनीही घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यांनी सांगितले की, चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. तर दुसरीकडे गोशाळेचे संचालक तसेच जामुल नगर पालिकेचे उपाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले की, 15 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील 90 फूट लांब भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत जखमी झाल्याने 27 गायींचा मृत्यू तीन दिवसांत मृत्यू झाला तर अन्य जखमी गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

उपासमारीमुळे गायींचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप  तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसनं गायींच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत असा आरोप केला आहे की, उपासमारीमुळे गायींचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आर.पी.सिंह असे म्हणालेत की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी न मिळाल्याच्या कारणामुळे गायींचा मृत्यू झाला आहे. शिवाय या गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतादेखील आहे, ज्यामुळे आतापर्यंत जवळपास 300 गायींचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस या मुद्यावरुन भाजपाला टार्गेट करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.