शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

छत्तीसगडमधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:03 IST

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे.

रायपूर, दि. 19 -  छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं याप्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दुर्ग क्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालक हरीश वर्मा यांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील गौसेवा आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  गोशाळेत होती प्रचंड अस्वच्छता काबरा यांनी सांगितले की, वर्माविरोधात छत्तीसगड कृषि-पशु संरक्षण कायदा 2004नुसार  द्यानुसार कलम 4 व 6 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960नुसार 11 आणि भादवि कलम 409 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गौसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईदेखील पसरल्याची माहिती समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणा-या राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत 27 गायींचा मृत्यू झाला आहे.  

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशु वैद्यांचं पथक घटनेच्या चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. शिवाय, उपविभागीय दंडाधिका-यांनीही घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यांनी सांगितले की, चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. तर दुसरीकडे गोशाळेचे संचालक तसेच जामुल नगर पालिकेचे उपाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले की, 15 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील 90 फूट लांब भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत जखमी झाल्याने 27 गायींचा मृत्यू तीन दिवसांत मृत्यू झाला तर अन्य जखमी गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

उपासमारीमुळे गायींचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप  तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसनं गायींच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत असा आरोप केला आहे की, उपासमारीमुळे गायींचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आर.पी.सिंह असे म्हणालेत की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी न मिळाल्याच्या कारणामुळे गायींचा मृत्यू झाला आहे. शिवाय या गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतादेखील आहे, ज्यामुळे आतापर्यंत जवळपास 300 गायींचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस या मुद्यावरुन भाजपाला टार्गेट करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.