शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:17 IST

Narendra Modi News: २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेल्या घडामोडींवरून मोदींनी काँग्रेसला निशाणा साधला. तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुंबई आणि देशभरात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. त्याबरोबरच २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेल्या घडामोडींवरून मोदींनी काँग्रेसला निशाणा साधला. तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडींबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी हल्लीच एका मुलाखतीमधून मोठा गौप्यस्फोट केला होता. त्याचाच आधार घेत नरेंद्र मोदी म्हणाले की, २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी संपूर्ण देश या हल्ल्याच्या वेदना सहन करत होता, तेव्हा काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले होते. हल्लीच काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा आपलं लष्कर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालं होतं. संपूर्ण देशाचीही तीच इच्छा होती. मात्र कुठल्यातरी अन्य देशाच्या दबावाखाली येऊन काँग्रेस सरकारने देशाच्या सैन्यदलांना पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले. तो कोण होता ज्याने परकीय दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला. तसेच मुंबई आणि देशवासियांच्या भावनांशी खेळ केला, हे काँग्रेसला सांगावे लागेल. अशी कोणत्या परकीय शक्तीच्या सांगण्यावरून हल्ला रोखला गेला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे, असे नरेंद्र मोदगी म्हणाले.

याबाबत पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसवर टीकास्र सोडताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली कबुली ही तत्कालीन यूपीए सरकारच्या कार्यकाळात राजकारण हे देशहितापेक्षा अधिक महत्त्वाचं मानलं जात होतं, हे सिद्ध करते. जर त्यावेळी देशात सक्षम आणि निर्णायक नेतृत्व असतं तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं गेलं असतं.  आजचा भारत हा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. आजचा भारत घरात घुसून मारतो. ऑपरेशन सिंदूर वेळी संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Modi corners Congress: Who ordered surrender after Mumbai attacks?

Web Summary : Modi slams Congress, citing Chidambaram's statement, questioning why the UPA government allegedly halted military action against Pakistan after the 2008 Mumbai attacks due to foreign pressure. Modi asserts India now retaliates decisively.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसNavi Mumbaiनवी मुंबईP. Chidambaramपी. चिदंबरम