शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे; बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:43 IST

केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

नवी दिल्ली : बिकानेरचे प्रसिद्ध समाजसेवक हरखचंद नाहटा यांच्या स्मरणार्थ २५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करण्यात येणार आहे. नाहटा यांचे सामाजिक योगदान आणि औदार्य पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

१९३६ मध्ये बिकानेरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात हरखचंद नाहटा यांचा जन्म झाला. समाजकार्य आणि उद्योजक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजकल्याण, धर्म, कला, संस्कृती आणि प्राण्यांबद्दल दयाळूपणा याचा प्रसार त्यांनी केला.

त्यांनी आदिवासी जीवनातील गंभीर आव्हाने सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी काम केले. पूर्वोत्तर राज्य त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून ते आगरतळापर्यंत रस्ता करण्यासारखे मोठे कार्य केले.

एकही पैसा न घेता...-"टेक्निशियन स्टुडिओ कोलकाता" आर्थिक परिस्थितीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे कला आणि संस्कृतीबद्दलचे समर्पण जगाने पाहिले.-नाहटा यांच्या व्यवस्थापनामुळे या स्टुडिओमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निर्मिती झाली.-विशेष म्हणजे एकही पैसा न घेता त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांना यात भागीदार बनविले. नाहटा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त टपाल विभागाने १९९९ मध्ये एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले होते.

असे असेल नवीन नाणेनवीन नाणे जारी करण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे तज्ज्ञ बिकानेरचे सुधीर लुणावत यांच्या मते, भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीतून बनवलेल्या या २५ रुपयांच्या नाण्याचे एकूण वजन ४० ग्रॅम असेल जे शुद्ध चांदीचे असेल.नाण्याची एकूण गोलाई ४४ मिलीमीटर असेल. नाण्याच्या समोरील बाजूस हरखचंद नाहटा यांच्या चित्राच्या वरच्या बाजूस हिंदीमध्ये तर खालच्या बाजूस इंग्रजीत ‘श्री. हरखचंद नाहटा यांचा २५ वा स्मरणोत्सव’ लिहिलेले असेल.चित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जीवनकाळ दाखविण्यात आला असून क्रमश: १९३६-१९९९ लिहिलेले असेल. 

टॅग्स :NatakनाटकRajasthanराजस्थान