शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे; बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:43 IST

केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

नवी दिल्ली : बिकानेरचे प्रसिद्ध समाजसेवक हरखचंद नाहटा यांच्या स्मरणार्थ २५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करण्यात येणार आहे. नाहटा यांचे सामाजिक योगदान आणि औदार्य पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

१९३६ मध्ये बिकानेरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात हरखचंद नाहटा यांचा जन्म झाला. समाजकार्य आणि उद्योजक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजकल्याण, धर्म, कला, संस्कृती आणि प्राण्यांबद्दल दयाळूपणा याचा प्रसार त्यांनी केला.

त्यांनी आदिवासी जीवनातील गंभीर आव्हाने सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी काम केले. पूर्वोत्तर राज्य त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून ते आगरतळापर्यंत रस्ता करण्यासारखे मोठे कार्य केले.

एकही पैसा न घेता...-"टेक्निशियन स्टुडिओ कोलकाता" आर्थिक परिस्थितीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे कला आणि संस्कृतीबद्दलचे समर्पण जगाने पाहिले.-नाहटा यांच्या व्यवस्थापनामुळे या स्टुडिओमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निर्मिती झाली.-विशेष म्हणजे एकही पैसा न घेता त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांना यात भागीदार बनविले. नाहटा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त टपाल विभागाने १९९९ मध्ये एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले होते.

असे असेल नवीन नाणेनवीन नाणे जारी करण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे तज्ज्ञ बिकानेरचे सुधीर लुणावत यांच्या मते, भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीतून बनवलेल्या या २५ रुपयांच्या नाण्याचे एकूण वजन ४० ग्रॅम असेल जे शुद्ध चांदीचे असेल.नाण्याची एकूण गोलाई ४४ मिलीमीटर असेल. नाण्याच्या समोरील बाजूस हरखचंद नाहटा यांच्या चित्राच्या वरच्या बाजूस हिंदीमध्ये तर खालच्या बाजूस इंग्रजीत ‘श्री. हरखचंद नाहटा यांचा २५ वा स्मरणोत्सव’ लिहिलेले असेल.चित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जीवनकाळ दाखविण्यात आला असून क्रमश: १९३६-१९९९ लिहिलेले असेल. 

टॅग्स :NatakनाटकRajasthanराजस्थान