शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मोठी दुर्घटना! लखीमपूर खेरीमध्ये घाघरा नदीत बोट बुडाली; 25 जण बेपत्ता, बचावकार्य वेगाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:59 IST

25 missing after boat capsized in ghaghra river : लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ईशानगर परिसरातील घाघरा नदीमध्ये बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. एका बोटमधील दहा जण हे सध्या बेपत्ता आहेत. तर आणखी एक बोटमधील 15 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाची टीम देखील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाघरा नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा जास्त असल्याने ही दुर्घटना घडली. बेपत्ता असलेल्या लोकांचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे. ही संख्या कमी किंवा जास्त असल्याचं देखील लोकांनी म्हटलं आहे. मटेरा जवळ झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 लोक बेपत्ता आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत

मिर्जापूर गावातील लोकांची नदीच्या दुसऱ्या बाजुला शेती असल्याने ते जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी नेहमीच जात असतात. पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना वाचवण्यासाठी वेगाने बचावकार्य सुरू आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ