शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आॅपरेशन आॅलआउट सुरू करताच २४ तासांत ४ अतिरेक्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:31 IST

जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. याशिवाय जवानांनी आज सकाळी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीमही हाती घेतली आहे. सर्च आॅपरेशन सुरू केले आहे.रमजानच्या महिन्याच्या काळासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली होती. भारतीय सुरक्षा दले या काळात स्वत:हून गोळीबार वा तत्सम कारवाई करणार नाहीत, पण दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यास त्यांना तोडीस तोड उत्तर देतील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले होते. ईद संपल्यानंतर शस्त्रसंधी संपवत असल्याची घोषणा सरकारने रविवारी केली. त्यानंतर, लगेचच सुरक्षा दलांनी आॅपरेशन आॅलआउट सुरू केले.बांदिपोरा येथे १४ जून रोजीही सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्या वेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मात्र, त्या कारवाईत एका जवानालाही वीरमरण आले होते.त्यानंतर, ईदच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी औरंगजेब नावाच्या एका जवानाचे अपहरण करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे आम्हाला लगेचच कारवाईची परवानगी मिळावी, अशी मागणी सशस्त्र दलाचे जवान करीत होते. याच काळात श्रीनगरमध्ये रायजिंग काश्मीरचे संपादक शुजार बुखारी यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. (वृत्तसंस्था)>२० अतिरेकी घुसले होतेदहा दिवसांपूर्वी पाकिस्तानातून बांदिपोराच्या जंगलात २० अतिरेकी घुसले, अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. तेव्हापासून या भागात शोधमोहीम सुरू आहे. या घनदाट जंगलात आता हे अतिरेकी दोन-तीनच्या गटांत विभागले असल्याचे कळते, त्यामुळे ही मोहीम कठीण होऊन बसली आहे.>बिजबेहारा भागातही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांनाआज सकाळी मिळताच,त्या भागाला वेढा घालण्यात आला आहे. तिेथे सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.>अतिरेक्यांनी अपहरण करून ठार मारलेले जवान औरंगजेब यांच्या वडिलांची लष्करप्रमुख ले. जनरल बिपिनकुमार रावत यांनी सोमवारी भेट घेतली.>अतिरेक्यांचा महिनाभर उच्छादशस्त्रसंधीच्या काळात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात खूपच उच्छाद मांडला होता. त्यांनी या महिनाभरात ग्रेनेडने २0 हल्ले केले व ५0 वेळा दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केले.या हल्ल्यांमध्ये ४१ जण मरण पावले. त्यात २४ दहशतवाद्यांचाही समावेश होता. बहुतांशी दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातच मारले गेले होते.

टॅग्स :Terrorismदहशतवाद