शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

आॅपरेशन आॅलआउट सुरू करताच २४ तासांत ४ अतिरेक्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:31 IST

जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. याशिवाय जवानांनी आज सकाळी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीमही हाती घेतली आहे. सर्च आॅपरेशन सुरू केले आहे.रमजानच्या महिन्याच्या काळासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली होती. भारतीय सुरक्षा दले या काळात स्वत:हून गोळीबार वा तत्सम कारवाई करणार नाहीत, पण दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यास त्यांना तोडीस तोड उत्तर देतील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले होते. ईद संपल्यानंतर शस्त्रसंधी संपवत असल्याची घोषणा सरकारने रविवारी केली. त्यानंतर, लगेचच सुरक्षा दलांनी आॅपरेशन आॅलआउट सुरू केले.बांदिपोरा येथे १४ जून रोजीही सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्या वेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मात्र, त्या कारवाईत एका जवानालाही वीरमरण आले होते.त्यानंतर, ईदच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी औरंगजेब नावाच्या एका जवानाचे अपहरण करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे आम्हाला लगेचच कारवाईची परवानगी मिळावी, अशी मागणी सशस्त्र दलाचे जवान करीत होते. याच काळात श्रीनगरमध्ये रायजिंग काश्मीरचे संपादक शुजार बुखारी यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. (वृत्तसंस्था)>२० अतिरेकी घुसले होतेदहा दिवसांपूर्वी पाकिस्तानातून बांदिपोराच्या जंगलात २० अतिरेकी घुसले, अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. तेव्हापासून या भागात शोधमोहीम सुरू आहे. या घनदाट जंगलात आता हे अतिरेकी दोन-तीनच्या गटांत विभागले असल्याचे कळते, त्यामुळे ही मोहीम कठीण होऊन बसली आहे.>बिजबेहारा भागातही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांनाआज सकाळी मिळताच,त्या भागाला वेढा घालण्यात आला आहे. तिेथे सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.>अतिरेक्यांनी अपहरण करून ठार मारलेले जवान औरंगजेब यांच्या वडिलांची लष्करप्रमुख ले. जनरल बिपिनकुमार रावत यांनी सोमवारी भेट घेतली.>अतिरेक्यांचा महिनाभर उच्छादशस्त्रसंधीच्या काळात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात खूपच उच्छाद मांडला होता. त्यांनी या महिनाभरात ग्रेनेडने २0 हल्ले केले व ५0 वेळा दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केले.या हल्ल्यांमध्ये ४१ जण मरण पावले. त्यात २४ दहशतवाद्यांचाही समावेश होता. बहुतांशी दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातच मारले गेले होते.

टॅग्स :Terrorismदहशतवाद