शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केदारनाथमधून २२८ किलो सोनं गायब, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:44 IST

Shankaracharya Avimukteswaranand News: केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा ते केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल, असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. 

राजधानी दिल्लीमध्येकेदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांकडून याला विरोध होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामि अविमुक्तेश्वरानंद यांनीही दिल्लीत केदारनाथ मंदिर उभारण्यास विरोध केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी केदारनाथ येथील मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. केदारनाथ मंदिरामधून २२८ किलो सोनं गायब झालं आहे, याचा हिशोब कोण देणार? असा आरोप शंकराचार्यांनी केला आहे. 

याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा ते केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल, असा आरोप शंकराचार्यांनी केला. 

मागच्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एक वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळीचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. याबाबत शंकराचार्य म्हणाले की, केदारनाथमध्ये २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही. 

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी दिल्लीमधील उत्तर पश्चिममध्ये असलेल्या हिरांकी परिसरात नव्या केदारनाथ मंदिराचं भूमीपूजन केलं. मात्र त्याला रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिरातील पूजाऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. याबाबत केदारनाथ सभेचे प्रवक्ते पंकज शुक्ल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही मंदिर बांधण्याविरोधात नाही आहोत. तर दिल्लीमध्ये एका धार्मिक ट्रस्टकडून केदारनाथ मंदिराची उभारणी करण्याच्या विरोधात आहोत. केदारनाथ क्षेत्रातून एक दगड जरी स्थानांतरीत केला गेला तरी केदारनाथ मंदिराचं पावित्र्य कमी होईल, असा दावा त्यांनी केला.  

टॅग्स :Kedarnathकेदारनाथdelhiदिल्लीUttarakhandउत्तराखंड