शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी महाराष्ट्राला २,२३५ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:13 IST

गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या सूत्रांनुसार पंतप्रधान आवास योजनेनुसार मार्च २०२२पर्यंत झोपडपट्टीसह शहरी भागातील गरिबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.   

नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रातील झोपडपट्टीवासीयांसाठी २.२३ लाखांहून अधिक घरे मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय मदत म्हणून राज्याला २,२३५.०६ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या सूत्रांनुसार पंतप्रधान आवास योजनेनुसार मार्च २०२२पर्यंत झोपडपट्टीसह शहरी भागातील गरिबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.   

या योजनेत स्वस्थानी झोपडपट्टी पुनर्विकासचाही (आयएसएसआर) समावेश आहे. यानुसार महाराष्ट्रातील नऊ शहरांत खासगी भागीदारीतून घर उपलब्ध करुन देण्यासाठी झोपडपट्टीवासीयांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यात आयएसएसआरनुसार आतापर्यंत एकूण २,२३,५०६ घरे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ७७,५६० घरांचे बांधकाम सुरू असून, १२,६७६ घरे तयार झाली आहेत. या योजनेखाली या घरांसाठी एकूण २,२३५.०६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते राज्याला दिले जातील.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात सर्व ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण १५८ शहरांची निवड झोपडपट्टी पुनर्विकासासाठी करण्यात आली आहे. यापैकी ६,७७६.९२ कोटी रुपयांच्या केंद्रीय निधीसह एकूण ४,५८,९४४ घरे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १,११,२७९ घरे तयार आहेत. २,३२,७२५ बांधकामाच्या स्थितीत आहेत. या योजनेखाली एकूण २,५९३.८१ कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहेत.