शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:40 IST

प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांचा विरोध पत्करून लग्न करतात. अनेकदा प्रेमविवाहामुळे धक्कादायक घटना घडतात. असं असताना एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात नाहरमऊ नावाचं एक गाव आहे.  या गावातील 21 वर्षीय महिला जानकी गोंड हिची ग्रामस्थांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. 

जानकीची सरपंच म्हणून निवड करण्यामागे एक रंजक कथा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा नाहरमऊ येथील गौरव पटेल याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. सुखी संसार सुरू होता. पण याच दरम्यान ती कधीतरी गावची सरपंच होईल असा विचार देखील तिने कधी केला नव्हता. पण अचानक चमत्कार झाला आणि हे सर्व घडलं. नाहरमऊ ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव होती. यानंतर गावात सरपंचपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तेव्हा फक्त जानकीच होती. 

जानकीला गावकरी आणि कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले आणि तिला बिनविरोध सरपंच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. विशेष म्हणजे आता आदिवासी विकास ब्लॉक केसली येथील नाहरमऊ ग्रामपंचायतीचा समावेश राज्यातील समरस पंचायतींमध्ये होणार आहे. येथे जानकी सरपंच व 16 पंचही बिनविरोध निवडून आले आहेत. जानकीला जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.

जानकीनमे दिलेल्या माहितीनुसार, "आता प्राधान्यक्रम बदलला आहे. पूर्वी मी घरातच होती, पण आता कुटुंब खूप मोठे झाले आहे. गावातील प्रत्येक समस्या मी गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढेन. सर्वात महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल. मी स्वतः फक्त दहावीपर्यंत शिकले आहे. आपली पुढची पिढी शिक्षित होऊन पुढे गेली पाहिजे. येथे पोलीस चौकी सुरू व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक घरात पाणी, स्वच्छतागृहे, घरांची व्यवस्था, चांगल्या रस्त्यांची व्यवस्था याकडे मी विशेष लक्ष देईन." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.