शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:40 IST

प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांचा विरोध पत्करून लग्न करतात. अनेकदा प्रेमविवाहामुळे धक्कादायक घटना घडतात. असं असताना एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात नाहरमऊ नावाचं एक गाव आहे.  या गावातील 21 वर्षीय महिला जानकी गोंड हिची ग्रामस्थांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. 

जानकीची सरपंच म्हणून निवड करण्यामागे एक रंजक कथा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा नाहरमऊ येथील गौरव पटेल याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. सुखी संसार सुरू होता. पण याच दरम्यान ती कधीतरी गावची सरपंच होईल असा विचार देखील तिने कधी केला नव्हता. पण अचानक चमत्कार झाला आणि हे सर्व घडलं. नाहरमऊ ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव होती. यानंतर गावात सरपंचपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तेव्हा फक्त जानकीच होती. 

जानकीला गावकरी आणि कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले आणि तिला बिनविरोध सरपंच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. विशेष म्हणजे आता आदिवासी विकास ब्लॉक केसली येथील नाहरमऊ ग्रामपंचायतीचा समावेश राज्यातील समरस पंचायतींमध्ये होणार आहे. येथे जानकी सरपंच व 16 पंचही बिनविरोध निवडून आले आहेत. जानकीला जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.

जानकीनमे दिलेल्या माहितीनुसार, "आता प्राधान्यक्रम बदलला आहे. पूर्वी मी घरातच होती, पण आता कुटुंब खूप मोठे झाले आहे. गावातील प्रत्येक समस्या मी गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढेन. सर्वात महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल. मी स्वतः फक्त दहावीपर्यंत शिकले आहे. आपली पुढची पिढी शिक्षित होऊन पुढे गेली पाहिजे. येथे पोलीस चौकी सुरू व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक घरात पाणी, स्वच्छतागृहे, घरांची व्यवस्था, चांगल्या रस्त्यांची व्यवस्था याकडे मी विशेष लक्ष देईन." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.