शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर", दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:45 IST

Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

Suvendu Adhikari : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील विजयामुळे भाजप नेत्यांनी जल्लोष केला. तर पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीचा विजय आमचा आहे, २०२६ मध्ये बंगालचा नंबर येईल.  दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. दिल्लीप्रमाणे बंगालमध्येही भाजपची लाट येईल आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर आरोप करत म्हटले की, बंगालमधील पोलिसांचा वापर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी केला जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय हा भ्रष्टाचार आणि खोट्या राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे. आपच्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात केला आणि भ्रष्टाचारात गुंतले, ज्याचे दिल्लीच्या जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. तसेच, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर बनवायला हवी होती, पण आपने ती उद्ध्वस्त केली, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात ज्या पद्धतीने विकास झाला आहे, तोच विकास दिल्लीतही व्हायला हवा होता, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने यमुना एक्सप्रेसवे आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या, परंतु दिल्ली सरकार त्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले. याशिवाय, निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक बंगाली मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचा दावा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdelhi electionदिल्ली निवडणूकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा