शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर", दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:45 IST

Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

Suvendu Adhikari : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील विजयामुळे भाजप नेत्यांनी जल्लोष केला. तर पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीचा विजय आमचा आहे, २०२६ मध्ये बंगालचा नंबर येईल.  दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. दिल्लीप्रमाणे बंगालमध्येही भाजपची लाट येईल आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर आरोप करत म्हटले की, बंगालमधील पोलिसांचा वापर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी केला जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय हा भ्रष्टाचार आणि खोट्या राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे. आपच्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात केला आणि भ्रष्टाचारात गुंतले, ज्याचे दिल्लीच्या जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. तसेच, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर बनवायला हवी होती, पण आपने ती उद्ध्वस्त केली, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात ज्या पद्धतीने विकास झाला आहे, तोच विकास दिल्लीतही व्हायला हवा होता, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने यमुना एक्सप्रेसवे आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या, परंतु दिल्ली सरकार त्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले. याशिवाय, निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक बंगाली मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचा दावा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdelhi electionदिल्ली निवडणूकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा