शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Lok Sabha Election 2019: च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 09:07 IST

Lok Sabha Election 2019 :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणाशीही आघाडी करणार नसल्याचंही अरविंद केजरीवालांनी स्पष्ट केलं. केजरीवालांनी हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या सभेला संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.    

 अनेक पक्ष महागठबंधनमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी देशाच्या विकासात कोणतीच भूमिका बजावलेली नाही असे ही केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या विकासात केंद्र सरकार हस्तक्षेप करून आडकाठी आणत असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला आहे. मी कोणत्याही महाआघाडीमध्ये सहभागी होणार नाही. दिल्लीतली अनेक कामे रखडण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. दिल्लीतल्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत आम्ही भरपूर काम केलं आहे. भाजपा हा पक्ष धर्माच्या नावाखाली लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना लोकांच्या भावनांशी काहीही देणं-घेणं नाही. तसेच केजरीवालांनी हरियाणातल्या भाजपा सरकारवरही टीका केली. 

दिल्लीच्या बरोबरीत हरियाणाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी खरा विकास  कसा करावा हे आमच्याकडून शिकावं. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसतानाही आम आदमी पार्टीनं वीज, पाणी आणि आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत क्रांतिकारी काम केलं आहे. हरियाणातलं खट्टर सरकार असा विकास का करू शकत नाही, असा प्रश्नही केजरीवालांनी विचारला आहे. तसेच अंबालाच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना खट्टर सरकारनं 1 कोटींची आर्थिक मदत करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप