शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

2016मध्ये रेल्वेचं सामान चोरणारे 11 लाख चोर पकडले, महाराष्ट्र अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 09:19 IST

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, कांबळ, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एकूण 11 लाख चोरांना 2016 मध्ये पकडलं.

ठळक मुद्देभारतीय रेल्वे चोरांची हक्काची जागा बनल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, कांबळ, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एकूण 11 लाख चोरांना 2016 मध्ये पकडलं.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे चोरांची हक्काची जागा बनल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, कांबळ, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एकूण 11 लाख चोरांना 2016 मध्ये पकडलं. रेल्वेतील सामानांपासून रेल्वे ट्रॅकची चोरी करताना या चोरांना पकडण्यात आलं आहे. यात महाराष्ट्र नंबर वनवर असून एकट्या महाराष्ट्रातूनच 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे.

रेल्वेच्या सामानाची चोरी करण्यामागे महाराष्ट्रातील चोर अव्वल असल्याचं पाहायला मिळतं आहे. रेल्वेच्या सामानाची चोरी करताना महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त चोर पकडले गेले आहेत. महाराष्ट्रातून एकुण 2 लाख 23 हजार चोर पकडले गेले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशातून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे. 

आरपीएनने लोकांना फिशप्लेट्स, बोल्ट्स, तारा, ट्यूबलाइट, पंखा, टॉवेल आणि ब्लॅन्केट चोरताना पकडलं आहे. या प्रकरणांमध्ये मध्यप्रदेशातू जवळपास 98 हजार लोकांना अटक करण्यात आलं. तर तामिळनाडूतून 81 हजार 408 आणि गुजरातमधून 77 हजार 047 लोक पकडली गेली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चांगल्या दर्जाच्या तारा आणि तांब्याच्या वस्तूंवर चोर निशाणा साधतात. तसंच रेल्वे स्टेशनवर उभी असलेल्या ट्रेनच्या कोचमधून सामानाची चोरी करतात. 

उत्तर रेल्वे झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गौरव बंसल यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात लोक लोखंडाची चेन फेकून विद्युत प्रवाह बंद करायचे आणि त्यानंतर तांब्याच्या तारांची चोरी करायचे. तसंच रेल्वे ट्रॅकच्या काही भागांची चोरीही केली जाते. एक मीटर ट्रॅकचा तुकडा जवळपास साठ किलो वजनाचा असतो. ज्याची किंमत चांगली मिळते. एक मीटर लांबीच्या ट्रॅकला भंगारात एक हजार रूपये किंमत मिळते. 

काही चोरांनी तेजस एक्सप्रेस आणि महामना एक्सप्रेसमधील नळही गायब केले. लोखंडाच्या ब्रेक ब्लॉकची चोरी वाढल्याने या चोरांना वैतागून रेल्वेने चाकांच्या खाली फायबरचे ब्रेक ब्लॉक लावण्यास सुरुवात केल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीtheftचोरी