शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्यापासून २००० ची नोट बँकेत जमा करता येणार; काय करायचे - काय नाही, RBI गव्हर्नरनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:07 IST

बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे

नवी दिल्ली - आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर आता २३ मे पासून म्हणजे उद्यापासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २००० नोटा बदलण्यावरून लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले आहे. लोकांकडे ४ महिन्यांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजाराची नोट पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. सध्या बाजारात असलेल्या २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये येण्याची शक्यता आहे. करन्सी मॅनेटमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. २ हजाराच्या नोटा लीगल टेंडर राहतील असंही आरबीआयने म्हटलं आहे. 

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ज्यांच्याकडे २००० रुपयांची नोट आहे तो ती त्याच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा इतर कोणत्याही मूल्याच्या चलनात बदलू शकतो. बँकांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत २००० रुपयांच्या बहुतांश नोटा परत मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. “सिस्टीममध्ये आधीच पुरेशी रोकड आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडेच नाही तर बँका चालवल्या जाणाऱ्या करन्सी चेस्टमध्येही पुरेशी रोकड आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. रिझर्व्ह बँक लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केंद्रीय बँक गरज पडल्यास नियमन आणेल असा दिलासाही आरबीआयने दिला. 

२००० रुपयांची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होईल. कारण एकूण चलन चलनात त्याचा वाटा फक्त १०.८ टक्के आहे. २०१६ च्या नोटाबंदीनंतर काढलेल्या चलनाची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांची नोट सादर करण्यात आली होती. आमच्याकडे पुरेशा नोटा आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सध्याच्या नियमांनुसार, ५०००० रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅन द्यावा लागतो. २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याच्या प्रक्रियेतही ही व्यवस्था सुरूच राहणार असल्याचे दास यांनी सांगितले.

शक्तिकांत दास यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे२००० रुपयांची नोट बदलताना गोंधळून जाऊ नका२००० च्या नोटा आणण्याचा उद्देश पूर्ण झालाबँका २००० रुपयांच्या नोटांची संपूर्ण माहिती ठेवतीलनोटा बदलण्यासाठी ४ महिनेसध्याच्या नियमांनुसारच नोटा जमा केल्या जातील२००० च्या नोटांची छपाई थांबली आहे.५०००० हजारांपेक्षा जास्त ठेवींवर माहिती द्यावी लागेल. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक