शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आठ स्मार्ट सिटींसाठी २ हजार कोटी, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर; राज्यात उच्चाधिकार सुकाणू समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:49 IST

smart cities : देशात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ४८ हजार १५० कोटींचा निधीतून २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण करण्यात आले. २५ जून २०१५ पासून सरकारने १०० शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी हे उपक्रम सुरू केले.

- विकास झाडेनवी दिल्ली : २०१५ नंतर मोदी सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमात किती शहरे ‘स्मार्ट’ होऊ शकले, हा संशोधनाचा विषय असला तरी महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्राने दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी दिला आहे. स्मार्ट सिटीसाठी राज्यस्तरावर उच्चाधिकार सुकाणू समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी दिली.देशात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ४८ हजार १५० कोटींचा निधीतून २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण करण्यात आले. २५ जून २०१५ पासून सरकारने १०० शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी हे उपक्रम सुरू केले. जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात ४ टप्प्यांमध्ये १०० स्मार्ट सिटींची निवड केली. या शहरांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आल्याचा दावाही केंद्र सरकारने केला आहे.केंद्र सरकारने केंद्राचा हिस्सा म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २३९२५ कोटी ८३ लाख रुपये जारी केले आहेत, त्यापैकी २०४१० कोटी १४ लाख म्हणजेच ८५ टक्के रक्कम स्मार्ट सिटींसाठी उपयोगात आणली आहे.

काय आहे राज्यातील शहरांची स्थिती?महाराष्ट्रातील आठ स्मार्ट सिटींसाठी आतापर्यंत २१२८ कोटी २३ लाखांचा निधी दिला आहे. यातील १९२० कोटी ९२ लाखांचा निधी उपयोगात आणला गेला. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी- चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांची स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी निवड झाली होती. या शहरांच्या विकासासाठी ९० टक्के निधी उपयोगात आणला आहे.

- ९ जुलै २०२१ पर्यंत या शहरांसाठी १ लाख ८० हजार ८७३ कोटींचा ६ हजार १७ प्रकल्प निविदा काढण्यात आल्या. यापैकी १ लाख ४९ हजार २५१ कोटींच्या ५ हजार ३७५ प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी केले आहेत. यापैकी ४८ हजार १५० कोटींचे २ हजार ७८१ प्रकल्प पूर्ण झाले.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी