शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातंय कुत्रे-मांजरांचं मांस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:03 IST

बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली.

कोलकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या राजाबाजारमध्ये एका बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसावर त्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये प्रक्रिया करून हॉटेल- रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातं असल्याचं समोर येतं आहे. कोलकात्यातील बर्फाच्या फॅक्टरीमध्ये सुरू झालेली छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छापेमारीत पॅक केलेल्या आणि विकण्यासाठी तयार असलेलं एकुण 20 टन मांस जप्त करण्यात आलं.  टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मेलेल्या जनावरांचं मांस घेऊन जाणाऱ्या तीन लोकांना अटक केल्यानंतरच्या एका आठवड्यात ही छापेमारी झाली आहे. जनावरांचं मांस बेकायदेशीरपणे विकलं जातं असल्याचा संशय गेल्या अनेक दिवसांपासून तेथिल यंत्रणांना होता. या कारवाईनंतर संशय खरा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसातील जास्त मास हे रस्त्यावरील कुत्रे व मांजरांचं असतं, असा दावा पोलिसांनी आधी अटक केलेल्या तीन आरोपींनी केला होता. दरम्यान, कुठल्याही निष्कर्षावर पोहचण्याआधी वैज्ञानिक परिक्षण करण्याचा सल्ला कोलकाता नगर निगमने दिला आहे. ताज्या मांसाबरोबर एकत्र केलं जातं जनावरांचं मांस

छापेमारीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जनावरांच्या मांसाला केमिकलबरोबर 44 डिग्री सेल्सिअस तापमानात चार ते पाच दिवस रेफ्रिजरेट केलं जातं. त्यानंतर त्याला ताज्या मांसात मिसळून 20 किलोच्या वजनाची पाकिटं तयार केली जातात. अशी एकुण 1 हजार पाकिटं महागड्या हॉटेलमध्ये विकली जातात.  केएमसीच्या अतिन घोष यांनी सांगितलं की, मांसाच्या तपासणीसाठी ते सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या संपर्कात आहे. या मांसाची चाचपणी सुरू आहे.