शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 2:10 PM

पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

कावेरी नदीचं पाणी कमी झाल्याने आणि वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्नाटकच्या बंगळुरूमधील काही भागात पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. पाण्याची वाट पाहावी लागत आहे. बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड, महादेवपुरा आणि आरआर नगरसारख्या भागात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

बंगळुरूमधील अनेक भागात बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एआर नगरच्या संपूर्ण पट्टानगरमध्ये लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकापेक्षा जास्त भांड्यात पाणी घेतल्यास अधिकारी परत पाठवतात, असा आरोप लोकांनी केला आहे.

अधिकारी आपल्या मुलांनाही सोबत राहू देत नसल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. ते मुलांना परत पाठवतात. जनावरांना आंघोळ घालण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठीही पाणी नसल्याचं लोक सांगतात. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. 

आरओ प्लांटमधून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त एकच कॅन घेण्याची परवानगी आहे. आम्हाला आता प्रत्येक कॅनसाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील, ज्यासाठी पूर्वी 600 ते 1000 रुपये आकारले जात होते. त्यांनी खासगी टँकरला पाण्याचे दर कमी करण्यास सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या भागात येणं बंद केलं, असा आरोप लोक करतात. सरकारला दररोज ई-मेल पाठवले जातात, पण आजपर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही.

बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट गंभीर होत आहे. तज्ज्ञांनी सरकारला जलसंकटाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. शेकडो अपार्टमेंटमध्ये पिण्याच्या पाण्याचा थेंबही नाही. उन्हाळा येण्याआधीच शहरातील सुमारे 50 टक्के बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. लोकांचे यामुळे अतोनात हाल होत असून अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईBengaluruबेंगळूर