शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:11 IST

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला.

ठळक मुद्देलोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

नवी दिल्ली - देशातील सत्तांतर होऊन 7 वर्षे झाल्यानंतर मोदी सरकारने आपल्या कामकाजाचे लेखाजोखा सोशल मीडियातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून मोदींच्या कार्यकाळात देशाने केलेल्या विकासाची गाणी गायली केली. मोदी सरकारच्या 7 वर्षीय कामाची तुलना काँग्रेसच्या 70 वर्षांसोबतही करण्यात आली. विशेष म्हणजे मोदी सरकार 2 मध्ये देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच, कोरोना महामारीने जनता त्रस्त झाली. तरीही, भाजपा नेत्यांनी विकासाचे गोडवेच गायले. याबाबत लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकार 2 काळातील कार्यासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे.

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून 2019 मध्ये सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून आजतागायत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी पैशांची जमावजमव केली जात असतानाच, दुसरीकडे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने देशाचं अर्थकारण बिघडलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्य दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला आहे. यासंदर्भातच लोकमत डॉट कॉमने मोदी सरकार 2 - कार्यकाळ अन् सर्वसामान्यांचे जीवन, यास अनुसरुन लोकमताच कौल घेतला आहे. 

लोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

होय, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महागाई वाढली की घटली? असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. त्यावर, मोठ्या प्रमाणात वाचकांनी सहभाग घेऊन आपलं स्पष्ट मत मांडल. त्यानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई वाढल्याचे मत 68.45 टक्के वाचकांनी मांडले आहे. महागाई घटल्याचे 13.45 टक्के वाचकांना वाटते. तर, महागाई जैसे थेच असल्याचे 18.08 टक्के वाचकांनी म्हटले आहे. त्यामुळे, एकंदरीचा जनताचा कौल मोदी सरकारच्या विरोधात असून जवळपास 69 टक्के वाचकांनी महागाईत वाढ झाल्याचे रोखठोक मत मांडले आहे. 

होय, मोदी सरकारच्य काळात अर्थव्यवस्था मंदावली...

लोकमतच्या सर्वेक्षणात दुसरा प्रश्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात होता. मोदी सरकार 2 च्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याही प्रश्नावरील सर्वेक्षण वाचकांना चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार, 57.68 टक्के वाचकांनी मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं मत नोंदलं आहे. 33.49 टक्के लोकांना वाटते, अर्थव्यवस्था सुधारली आहे. तर, 8.84 टक्के लोक या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे, मोदी सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं जनमत स्पष्ट दिसून आहे.

लोकमतच्या सर्वेक्षणातून वाचकांनी मोदी सरकार 2 च्या कामगिरीवर नाराजी दर्शवली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि महागाई या परस्परपूरक बाबी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे, वाचकांना सजग नागरिक असल्याचं दाखवत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे, मोदी सरकारला पुढील 3 वर्षात महागाई कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची वाटचाल सुधारणेसाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, तेच मोदी सराकरपुढे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याLokmatलोकमतEconomyअर्थव्यवस्थाInflationमहागाई