शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:35 IST

पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.  

ठळक मुद्देकाश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

श्रीनगर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखल्याचे समजते. त्यातच, आज पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली आहे. त्यामध्ये, दोन दशहतवाद्यांना कंठस्नान देण्यात आलं आहे. 

काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. मात्र, जवानांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.   काश्मीर खोऱ्यात सातत्याने दहशतवादी कारवाया सुरु आहेत. पण, भारतीय सैन दलाकडून या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात येते. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.  दरम्यान, स्वातंत्र्य दिनी किंवा त्याच्या आसपास लखनऊसह महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना दोनच दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं. यानंतर आता आयएसआयचा आणखी एक प्लान समोर आला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आल्याची माहिती आहे.

पाकिस्तानातही टीटीपी दहशतावाद्यांचा हल्ला

पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात दोन दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगरIndian Armyभारतीय जवान