शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

रिटेल क्षेत्रातील २ लाख कामगार बेकार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:50 IST

लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या निर्मूलनासाठी लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सर्वांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने देशभरात त्याचे पालन होत आहे. असे असले, तरी त्याची दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, देशातल्या किरकोळ विक्री क्षेत्रातील ४० टक्के म्हणजे, दोन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (आरएआय) व्यक्त केली आहे.आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, देशातील किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये ६० लाख कामगार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे किरकोळ क्षेत्रातील वस्तूंची विक्री कमी झाली असून, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील अनेक व्यापारी कपडे, ज्वेलरी आदींची विक्री करतात. त्यांच्या उत्पन्नात टाळेबंदीमुळे ७५ टक्के घट झाल्याचा दावा राजगोपालन यांनी केला.ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.सरकारकडे सवलतींची मागणीकिरकोळ व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, तसेच जीएसटीचा भरणा करण्यात केंद्र सरकारने काही काळ सवलत द्यावी. तसे न झाल्यास या व्यापाºयांच्या उत्पन्नात आगामी सहा महिन्यांत ९० टक्के घट होईल, अशी भीती आरएआयने व्यक्त केली आहे. आरएआय या संस्थेमध्ये किरकोळ विक्री करणारे पाच लाख दुकानदार सदस्य आहेत. त्यामध्ये व्ही. मार्ट, शॉपर स्टॉप, फ्युचर ग्रुप, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स आदींचा समावेश आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील महत्त्वाच्या अन्य कंपन्यांनी कोरोना साथीमुळे आपले उत्पन्न घटल्याचे याआधीच जाहीर केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या