शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेत २ लाख ६३ हजार, तर गृह मंत्रालयात १ लाख जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:11 IST

रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील २,६३,९१३ पदे रिक्त असून,  सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये १,१४,२४५ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत कनिमोई करुणानिधी, एम सेल्वराज, कौशलेंद्र कुमार, पीआर नटराजन आणि हिबी इडेन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै २०२३ पर्यंत, रेल्वेमध्ये राजपत्रित संवर्गाची २,६८० पदे आणि अराजपत्रित संवर्गाची २,६१,२३३ पदे रिक्त आहेत. 

दीड लाख जागांसाठी भरती सुरूरेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

कमतरता कुठे ? - केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत. - केंद्रीय गृह मंत्रालय आणि त्याअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या सुमारे १,१४,२४५ जागा रिक्त आहेत.

जवानांचा जॉबला टाटा २०१८     १०,९४०२०१९     १०,३२३२०२०     ७,६९०२०२१     १२,००३२०२२     १२,३८०

पाच वर्षांत ५३,३३६ जवानांनी सोडली नोकरी- गेल्या पाच वर्षांत (२०१८ ते २०२२) ५३,३३६ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. - ४७ हजार सैनिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याच वेळी ६,३३६ जवानांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली.

आत्महत्याही वाढल्या : २०१८ ते २०२२ दरम्यान एकूण ६५८ जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २३० सीआरपीएफ, १७४ बीएसएफ, ९१ सीआयएसएफ, ६५ एसएसबी, ५१ आयटीबीपी आणि ४७ आसाम रायफल्सच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. दर वर्षामध्ये आत्महत्या करणाऱ्या जवानांचे प्रमाण वाढत आहे.

नोकरी सोडण्याचे प्रमाण कुठे वाढले? बीएसएफ    २३,५५३सीआरपीएफ     १३,६४०सीआयएसएफ     ८० भारत तिबेट पोलिस     ३,१६५सशस्त्र सीमा दल     २,४३४

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेHome Ministryगृह मंत्रालयrailwayरेल्वेjobनोकरी