शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

भारतीय रेल्वेत २ लाख ६३ हजार, तर गृह मंत्रालयात १ लाख जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:11 IST

रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील २,६३,९१३ पदे रिक्त असून,  सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये १,१४,२४५ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत कनिमोई करुणानिधी, एम सेल्वराज, कौशलेंद्र कुमार, पीआर नटराजन आणि हिबी इडेन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै २०२३ पर्यंत, रेल्वेमध्ये राजपत्रित संवर्गाची २,६८० पदे आणि अराजपत्रित संवर्गाची २,६१,२३३ पदे रिक्त आहेत. 

दीड लाख जागांसाठी भरती सुरूरेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

कमतरता कुठे ? - केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत. - केंद्रीय गृह मंत्रालय आणि त्याअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या सुमारे १,१४,२४५ जागा रिक्त आहेत.

जवानांचा जॉबला टाटा २०१८     १०,९४०२०१९     १०,३२३२०२०     ७,६९०२०२१     १२,००३२०२२     १२,३८०

पाच वर्षांत ५३,३३६ जवानांनी सोडली नोकरी- गेल्या पाच वर्षांत (२०१८ ते २०२२) ५३,३३६ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. - ४७ हजार सैनिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याच वेळी ६,३३६ जवानांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली.

आत्महत्याही वाढल्या : २०१८ ते २०२२ दरम्यान एकूण ६५८ जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २३० सीआरपीएफ, १७४ बीएसएफ, ९१ सीआयएसएफ, ६५ एसएसबी, ५१ आयटीबीपी आणि ४७ आसाम रायफल्सच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. दर वर्षामध्ये आत्महत्या करणाऱ्या जवानांचे प्रमाण वाढत आहे.

नोकरी सोडण्याचे प्रमाण कुठे वाढले? बीएसएफ    २३,५५३सीआरपीएफ     १३,६४०सीआयएसएफ     ८० भारत तिबेट पोलिस     ३,१६५सशस्त्र सीमा दल     २,४३४

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेHome Ministryगृह मंत्रालयrailwayरेल्वेjobनोकरी