शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:22 IST

तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे कसे जगायचे हे शिकवले. कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला तोंड द्यायला शिकवले असं त्यांनी सांगितले. 

नाहन - हिमाचल प्रदेशच्या सिरमौर येथे २ भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केले होते. आता या २ भावंडांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या भावांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. या भावंडांच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंब आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. 

सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात २ भावांनी एकाच मुलीसोबत जुलै महिन्यात लग्न केले होते. सुनीता नावाच्या युवतीसोबत एकत्र संसार थाटला. या लग्नाची देशभरात चर्चा झाली. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील एका प्रथेबाबत लोकांना कळले. आता या भावंडांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. या भावांनी वडिलांना फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, पप्पा, तुमच्या जाण्यानंतर आता पहिल्यासारखं आयुष्य राहिले नाही. तुम्ही केवळ आमचे वडील नव्हता तर आमची ताकद, आमचा आधार आणि आमचे जग होता. आजही जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा तुमच्या आठवणीने हिंमत मिळते. तुमच्या विना घरात एकटेपणा वाटतो. तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे कसे जगायचे हे शिकवले. कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला तोंड द्यायला शिकवले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आजही तुमच्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात मार्ग दाखवण्याचे काम करतात. तुम्ही निघून गेलात परंतु तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही वरून आम्हाला पाहत असाल. आमच्या प्रत्येक सुखात तुम्ही सोबत आहात. तुम्ही आमच्या प्रत्येक श्वासात आहात. मिस यू पप्पा असंही या भावांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे. या दोन्ही भावांचे वडील दीर्घ काळापासून कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. अलीकडेच त्यांचे निधन झाले आहे.

जुलैमध्ये झालेल्या लग्नाने मिळाली प्रसिद्धी

प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन्ही भावांनी जुलै महिन्यात सुनीता नावाच्या एकाच मुलीसोबत लग्न केले होते. या २ भावांनी एकाच मुलीशी लग्न केल्याने देशभरात चर्चेचा विषय बनला. यातील एक भाऊ पाणी पुरवठा खात्यात काम करतो, तर दुसरा परदेशात नोकरीला आहे. हिमाचल प्रदेशातील हाटी समुदायात एकाच मुलीसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. एका कुटुंबातील ५ भावांनीही एका महिलेसोबत लग्न केले होते. हाटी समुदायात ही प्रथा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. संपत्तीचा वाटप होऊ नये म्हणून ही प्रथा सुरू झाली होती. या प्रथेला पांडवांशीही जोडले जाते. त्यांनीही एका महिलेशी लग्न केले होते.