शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पश्चिम बंगालमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 07:56 IST

बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती

मालदा: पश्चिम बंगालमधल्या मालदात बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर बाकीचे प्रवासी बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त झालेली बोट बिहारच्या कटिहारमधून पश्चिम बंगालमधल्या मालदाला जात होती. महानंदा नदीमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला. मालदा जिल्ह्यातल्या चंचल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकूंदपूर घाट परिसरात पोहोचण्यापूर्वीच प्रवासी बोट उलटली. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बोटीतून ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगानं बचावकार्य सुरू आहे. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण दिनाजपूरमध्ये बैच उत्सव पाहण्यासाठी चालले होते.  आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून एकूण प्रवासी संख्या पाहता मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती मालदाचे पोलीस अधीक्षक आलोक रजारिया यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकलदेखील होत्या. याशिवाय बोटीतील प्रवाशांची संख्यादेखील जास्त होती. सध्या घटनास्थळी पूर्ण क्षमतेनं बचावकार्य सुरू असल्याचं रजारिया यांनी सांगितलं. 

टॅग्स :Accidentअपघात