शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

Video - बसपा पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांनीच गाढवावरून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 18:56 IST

राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला.जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली.

जयपूर - राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) बसपाच्या कार्यकर्त्यांनीच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आणि उपाध्यक्ष रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील बसपाचे कार्यकर्ते हे आपल्याच पक्षातील काही लोकांमुळे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथे आलेल्या बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकांसह दोघांना नाराज असलेल्या काही कार्यकर्त्यांनी घेरलं. तसेच दोन गाढवं आणि हातात ग्रीस घेऊन कार्यकर्ते आले होते. त्यांनी रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला. तसेच जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेनंतर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसने आधी राजस्थानमध्ये बसपाचे आमदार फोडले आणि आता राज्यातून आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी बसपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. राजस्थानात जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने घडवून आणलेल्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील मायावती यांनी दिला आहे. 

राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने याआधीही काही दिवसांपूर्वी मायावती संतप्त झाल्या होत्या. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला होता. तसेच आपल्या ट्विटमध्ये ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे'' असं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थान