शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Video - बसपा पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांनीच गाढवावरून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 18:56 IST

राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला.जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली.

जयपूर - राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) बसपाच्या कार्यकर्त्यांनीच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आणि उपाध्यक्ष रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील बसपाचे कार्यकर्ते हे आपल्याच पक्षातील काही लोकांमुळे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथे आलेल्या बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकांसह दोघांना नाराज असलेल्या काही कार्यकर्त्यांनी घेरलं. तसेच दोन गाढवं आणि हातात ग्रीस घेऊन कार्यकर्ते आले होते. त्यांनी रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला. तसेच जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेनंतर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसने आधी राजस्थानमध्ये बसपाचे आमदार फोडले आणि आता राज्यातून आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी बसपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. राजस्थानात जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने घडवून आणलेल्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील मायावती यांनी दिला आहे. 

राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने याआधीही काही दिवसांपूर्वी मायावती संतप्त झाल्या होत्या. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला होता. तसेच आपल्या ट्विटमध्ये ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे'' असं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थान