शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१९८८ साली डिजिटल कॅमेऱ्याने काढलेला फोटो मी ई-मेल केला, मोदी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 06:54 IST

भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे वीरमगाममधील सभेचे छायाचित्र मी डिजिटल कॅमे-याने काढले आणि लगेच ते ई-मेल केले.

नवी दिल्ली : भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे वीरमगाममधील सभेचे छायाचित्र मी डिजिटल कॅमे-याने काढले आणि लगेच ते ई-मेल केले. ते रंगीत छायाचित्र दुस-याच दिवशी दिल्लीच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याने अडवाणी यांनाही आश्चर्य वाटले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियामध्ये टीका सुरू झाली आहे.

ही टीका होण्याचे कारण म्हणजे १९८८ साली भारतात डिजिटल कॅमेरा उपलब्ध नव्हता. एवढेच नव्हे, तर त्यावेळी भारतात ई-मेलचीही सोय नव्हती. त्यामुळे मोदी यांच्या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. अनेकांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी यांच्या वरील दाव्यावर टीका करताना भारतात इंटरनेट १४ आॅगस्ट १९९५ रोजी सुरू झाल्याचे पुरावेच दिले आहे. विदेश संचार निगमतर्फे १५ आॅगस्ट रोजी ही सोय झाल्याचे अनेकांनी दाखवून दिले आहे.

भारतात फार लोकांकडे त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता. माझ्याकडे तो होता. त्यावेळी त्याचा आकारही खूप मोठा असायचा, असेही मोदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले. पण त्या काळात भारतात डिजिटल कॅमेरा आला नव्हता, असेही अनेकांनी दाखवून दिले आहे. डिजिटल कॅमेरा व ई-मेल या दोन्हींचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख फसवा असल्याचे नेटिझन्सनी म्हटलेआहे.

अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्या यांनी म्हटले आहे की, १९८८ साली पाश्चात्य देशांतील केवळ काही वैज्ञानिकांकडेच ई-मेल असायचा. पण भारतात तो येण्याआधी १९८८ सालीच मोदी यांनी त्याचा वापर केल्याचे दिसते! शाहीद अख्तर यांनी लिहिले आहे की भारतात डिजिटल कॅमे-याची विक्रीच १९९0 साली सुरू झाली. ई-मेलही १९९५ साली आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी १९९८ साली पहिला ई-मेल पाठवल्याचा उल्लेखही एकाने केला आहे, तर ई-मेलद्वारे जे पहिले रंगीत छायाचित्र १९९२ साली पाठवण्यात आले, तेही सोशल मीडियावर टाकले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनीही मोदी यांची खिल्ली उडवली आहे. एमआएमचे नेते असउद्दिन ओवेसी म्हणाले की, मोदी यांच्याकडे पैशांचे पाकिट नव्हते. पण महागडा कॅमेरा मात्र १९८८ साली होता!

ढगाळ हवामानाचा एअर स्ट्राइकला फायदामोदी मुलाखतीत म्हणाले की, 'बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अचानक हवामान बिघडले. त्यामुळे हवाई दलाचे वैमानिक पाकिस्तानच्या हद्दीत शिरू शकतील का, याविषयी साशंकता होती. माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्ततेचा आणि दुसरा म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नसल्याचा.मात्र मी विचार केला की, आभाळ फारच भरून आले असेल आणि पाऊस असेल तर आपली विमाने पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाहीत. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल. सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आले आहे, चला पुढे जाऊ या. त्यांच्या या विधानाचीही खिल्ली उडवली जात आहे. हवामानशास्त्राचे शिक्षण मोदी यांनी घेतले कुठे, असा सवाल अनेकांनी विचारला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक